एक्स्प्लोर
Urban Crisis: 'निवडून येतात आणि मागणींकडे दुर्लक्ष करतात', Bhiwandi तील नागरिकांचा प्रशासनावर संताप
भिवंडी (Bhiwandi) शहरातील नागरिक रस्ते, वाहतूककोंडी, कचरा आणि पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमुळे (Municipal Corporation Election) नगरसेवकांऐवजी प्रशासकीय राजवटीवर (Administrator Rule) अवलंबून राहावे लागत आहे. एका संतप्त नागरिकाने म्हटले आहे, ‘जवळजवळ चार वर्षे झाली महानगरपालिकेने इलेक्शन घेतलेलं नाहीये, तर प्रशासकाने कुठल्याही जबाबदारीने कुठलेही काम केलेलं नाहीये.’. नागरिकांच्या मते, निवडून आलेले प्रतिनिधी अनेकदा आश्वासने पूर्ण करत नाहीत आणि निवडून आल्यावर समस्यांकडे दुर्लक्ष करतात. धुळीमुळे पसरणारी रोगराई, रात्री-अपरात्री होणारे रस्त्यांचे खोदकाम आणि स्वच्छतेचा अभाव या गंभीर समस्या आहेत. आगामी निवडणुकीत कोणत्याही दबावाला बळी न पडता सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार निवडण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. भिवंडीप्रमाणेच परभणी (Parbhani) शहराची अवस्थाही बिकट असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















