एक्स्प्लोर
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने चार जिल्ह्यातील नामांकित ११३ महाविद्यालयांचे पदव्युत्तर (Postgraduate) प्रवेश थांबवले आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमधील एकोण ऐंशी, जालन्यातील चाळीस, बीडमधील चव्वेचाळीस आणि धाराशिवमधील चोवीस महाविद्यालयांचा समावेश आहे. प्राध्यापकांच्या जागा न भरणे, कागदोपत्री नियुक्त्या करूनही वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीची सुविधा नसणे, कॉलेजला आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा नसणे ही या कारवाईमागील प्रमुख कारणे आहेत. या महाविद्यालयांमध्ये आजी, माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह बड्या नेत्यांच्या संस्थांचा समावेश आहे. हरिभाऊ बागडे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, सतीश चव्हाण, प्रकाश साळुखे, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील, राणा जगजीतसिंघ आणि मधुकर चव्हाण यांच्याशी संबंधित संस्थांवर कारवाई झाली आहे. विद्या परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही राजकीय दबावाची पर्वा न करता विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. शिक्षण संस्थांमधील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. 'छडी लागे छमछम, विद्यायेई घमघम' या म्हणीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात शिस्त आणण्याची गरज आहे.
महाराष्ट्र
Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
आणखी पाहा





















