एक्स्प्लोर
Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीबाबत गुरूवारी फैसला
अलिबाग येथील वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या अर्णव गोस्वामींना पोलीस कोठडी मिळणार का?, याचा निर्णय गुरूवारी होणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायाधीश मलिशेट्टी यांनी गुरूवारी निकाल जाहीर करू असं स्पष्ट केलं आहे. अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींच्याही पोलीस कोठडीबाबत कोर्ट निर्णय देणार आहे. त्यानंतर या तिन्ही आरोपींच्या जामीनावर सुनावणी होईल. कारण जर सत्र न्यायालयानं राज्य सरकारची याचिका स्वीकारली तर आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत होईल आणि मग जामीनाचा प्रश्नच उद्भवणार नाही.
आत्महत्येस प्रवृत्त करणे, त्यानंतर पीडित कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. याप्रकरणी पोलिसांना काही नवे धागेदोरे सापडले आहेत. त्यामुळे याप्रकरणाचा अधिक तपास होणं गरजेचं असून त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे. असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीनं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. ज्याला विरोध करत आरोपींच्यावतीनं या प्रकरणी झालेली अटकच चुकीची असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देता येणार नाही, असा त्यांचा दावा होता.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















