Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणतात, दादांनी खंत व्यक्त केली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणतात, दादांनी खंत व्यक्त केली
ही बातमी पण वाचा
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
Umesh Patil on Ajit Pawar: राज्यात सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला पाहिजे. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. यावत आता राष्टवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी कारण सांगितलंय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.यावर राष्ट्रवादीा शरद पवार गटासह विरोधी पक्षांकडून प्रतिक्रीया येत आहेत. पण अजित पवार असं का म्हणाले यावर राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी काय सांगितलं?
काय म्हणाले उमेश पाटील?
अजित पवार यांनी बारामतीचा जो विकास केलेला आहे तो पाहिला जगभरातून लोक येतात असं असताना देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी आवाहन अजित पवार यांनी करूनही त्यांचा पराभव झाला यामुळेच अजित पवारांनी आपली खंत बोलून दाखवली असावी असं त्यांच्या भाषणातून वाटतं. असं प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.