Anil Parab on Amruta Fadnavis | असुरक्षित वाटतंय, तर अमृता फडणवीसांनी राज्य सोडावं - अनिल परब
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्ष अमृत फडणवीस सरकारने पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो.