एक्स्प्लोर
Jalgaon Protest | जळगावमध्ये Bachchu Kadu यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी सभास्थळी न आल्याने माजी आमदार Bachchu Kadu यांच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. माजी खासदार Unmesh Patil हे देखील या मोर्चात सहभागी होते. सुरुवातीला केवळ पाच व्यक्तींनाच आत जाण्याची परवानगी दिली जात होती, मात्र शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर Bachchu Kadu यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडले आणि शेतकरी आतमध्ये घुसले. सुमारे पंचवीस ते तीस शेतकरी Bachchu Kadu आणि Unmesh Patil यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. तिथे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. "शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement

















