एक्स्प्लोर
अंबरनाथकरांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरु, मनसेकडून अधिकाऱ्यांचा सत्कार
चिखलोली धरणाचं पाणी दूषित झाल्यामुळे मागील वर्षीपासून या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी धरण पूर्णपणे भरून वाहू लागलं असताना दुसरीकडे अंबरनाथ शहरात मात्र पाणीटंचाई भासत होती. त्यामुळे चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी मनसेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. तसेच त्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० ऑक्टोबर पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ९ ऑक्टोबर पासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्यामुळे नेहमी अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने चिखलोली धरणावर जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
मुंबई
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
आणखी पाहा






















