एक्स्प्लोर
अंबरनाथकरांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरु, मनसेकडून अधिकाऱ्यांचा सत्कार
चिखलोली धरणाचं पाणी दूषित झाल्यामुळे मागील वर्षीपासून या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी धरण पूर्णपणे भरून वाहू लागलं असताना दुसरीकडे अंबरनाथ शहरात मात्र पाणीटंचाई भासत होती. त्यामुळे चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी मनसेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. तसेच त्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० ऑक्टोबर पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ९ ऑक्टोबर पासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्यामुळे नेहमी अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने चिखलोली धरणावर जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक



















