एक्स्प्लोर
अंबरनाथकरांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरु, मनसेकडून अधिकाऱ्यांचा सत्कार
चिखलोली धरणाचं पाणी दूषित झाल्यामुळे मागील वर्षीपासून या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी धरण पूर्णपणे भरून वाहू लागलं असताना दुसरीकडे अंबरनाथ शहरात मात्र पाणीटंचाई भासत होती. त्यामुळे चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी मनसेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. तसेच त्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० ऑक्टोबर पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ९ ऑक्टोबर पासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्यामुळे नेहमी अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने चिखलोली धरणावर जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
ट्रेडिंग न्यूज
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























