एक्स्प्लोर
Ahmednagar: अहमदनगर नामांतरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान
Ahmednagar: अहमदनगर नामांतरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान अहमदनगरचं अहिल्यानगर करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलंय...तशी याचिका अहमदनगरच्या मोईन अब्दुललतिफ देशमुख यांनी दाखल केली असून त्याची पुढील सुनावणी ही 21जूनला होणार आहे... नामांतराची मागणी केली नसताना कुणालाही विचारात न घेता जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला असे मुद्दे याचिकेत मांडण्यात आलेत.राज्य शासनासह जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
आणखी पाहा






















