मुंबई: राष्ट्रीय सौरचूल स्पर्धेत आयआयटी मुंबईची बाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयआयटी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ओएनजीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौरचूल स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या टीमने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सव निमित्त ओएनजीसीतर्फे नुकतीच एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी १५००हून अधिक अर्जांची नोंदणी झाली होती. या सर्वांना टक्कर देत आयआयटीची सौरशेगडी अव्वल ठरली आहे. ओनजीसी अशाप्रकारच्या एक हजार सोलर शेगडीची निर्मिती या टीमकडून करणार आहे.