एक्स्प्लोर
माझा विशेष | शिवस्मारकाची जागा बदलायला हवी का?
शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून समोर आली आहे तर माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी आपली मुंबई या संस्थेद्वारे स्मारक भाऊच्या धक्क्यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे.
राजकारण
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
आणखी पाहा

















