एक्स्प्लोर
#BiharElection2020 बिहारच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने? कोण जिंकणार बिहारची 'दंगल'? पटना
बिहारमध्ये जेव्हा मतदानाचा पहिला टप्पा संपलेला आहे. त्यानंतर नितीशकुमारांनी जातीसारख्या संवेदनशील विषयाला हात घातलाय. नितीशकुमार यांची यावेळी सगळीकडून घेराबंदी सुरु असतानाच त्यांनी हा विषय प्रचारात आणून बाजी पलटवयाचा प्रयत्न केलाय. पण तो किती यशस्वी होतो हे निकालातच कळेल. महाराष्ट्रातही सध्या आरक्षणाचे विषय चर्चेत आहेतच..त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमारांच्या या विधानाला पुन्हा राजकीय वर्तुळातून कुठून कुठून पाठबळ मिळतंय. आणि खरंच पुढची जनगणना जातनिहाय होणार का याची उत्सुकता असेल.
आणखी पाहा
























