नवी दिल्ली: आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजपासून दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात एकूण 46 विधेयकांवर चर्चा होणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केलंय. या अधिवेशनात अफवा पसरवून होणाऱ्या हिंसक घटना, गुंतवणूक आणि रोजगाराचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार, बोथट करण्यात आलेला दलित अत्याचारविरोधी कायदा, शेतकऱ्यांच्या समस्या, नोटबंदीनंतर सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, महागाई अशा विषयांवर विरोधकांना अधिवेशनात सविस्तर चर्चा करायची आहे. त्यासाठी अविश्वास ठराव मांडला जाणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केलंय. या अधिवेशनात अफवा पसरवून होणाऱ्या हिंसक घटना, गुंतवणूक आणि रोजगाराचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार, बोथट करण्यात आलेला दलित अत्याचारविरोधी कायदा, शेतकऱ्यांच्या समस्या, नोटबंदीनंतर सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, महागाई अशा विषयांवर विरोधकांना अधिवेशनात सविस्तर चर्चा करायची आहे. त्यासाठी अविश्वास ठराव मांडला जाणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय.