एक्स्प्लोर
#PhoneTapping यड्रावकरांनी भाजपसोबत राहण्यासाठी शुक्लांनी संपर्क केला, आव्हाडांचा शुक्लांवर आरोप
मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















