औरंगाबाद : गोलवाडी आणि तीसगाव भागातील संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नानं आता उग्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली. आज सोळाव्या दिवशी महापालिकेने तिसगाव परिसरातील गोलवाडी कचरा डेपो परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोलवाडी आणि तीसगाव परिसरातील नागरिकांनी हा प्रयत्न हणून पाडला. नागरिक जमण्याआधी महापालिकेने कचऱ्याच्या पाच गाड्या खाली केल्या. कचरा उतरवत असल्याची बातमी तिसगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कचरा उतरवण्यास नागरिकांनी विरोध केला. दरम्यान, एक छोटी रिक्षा कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली. यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.