औरंगाबाद : सोळाव्या दिवशी कचराकोंडी कायम, पोलीस बंदोबस्तात कचऱ्याच्या गाड्या रवाना होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलग १६ दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे आज पोलिसांच्या बंदोबस्तात कचऱ्याच्या गाड्या रवाना केल्या जाणार आहेत. दुसरकीडे नारेगावचे ग्रामस्थ मात्र अजूनही औरंगाबाद शहरातल्या कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत. काल यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकही निष्फळ ठरली. काल नारेगावच्या ग्रामस्थांकडे ३ महिन्यांपर्यत कचरा टाकू द्यावा, अशी विनंती केली. त्यामोबदल्यात विशेष निधीचं आश्वासन दिलं गेलं. मात्र, नारेगावचे ग्रामस्थ कचरा टाकू न देण्यावर ठाम राहिले.