Sanjay Raut : 24 तासात राऊतांनी सोडलं मौन, सामनातू भाजपवर निशाणा Special Report
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (29 मार्च) केलेल्या एका ट्वीटमुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं..., असं ट्वीट करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या. त्यावर भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाला असेल. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. मौन धारण केल्याच्या चर्चांनंतर संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























