Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
सरसंघचालक मोहन भागवतांच्या मुंबईत झालेल्या व्याख्यानाचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात उमटतायत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यानंतर आता सरसंघचालकांनी भाषेबाबत केलेलं विधान चर्चेत आलंय. त्याचं कारण ठरलीय राज ठाकरेंनी केलेली एक फेसबुक पोस्ट. भाषेवरून होणाऱ्या आंदोलनांबाबत भागवतांनी केलेल्या विधानाला राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आणि त्यांना भाषावार प्रांतरचनेची आठवण करून दिली. त्यानंतर भाजपनं राज ठाकरेंवर पलटवार केल्यामुळं आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवतांनी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केली.
त्यात महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या अनुषंगानं त्यांनी केलेल्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय.
यासाठी मोहन भागवतांना उद्दे्शून त्यांनी खरमरीत फेसबुक पोस्ट लिहिलीय.
मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, आंदोलन करणं हा आजार असं विधान केलं.
भाषावार प्रांतरचना का करावी लागली? हा इतिहास भागवतांना माहित असावा
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा 'आजार' बहुसंख्य राज्यात आहे
चार-पाच राज्यांतील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आगाऊपणा करतात.
या झुंडी तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून,तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात.
तेव्हा झुंडींविरोधात स्थानिकांत रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो.
तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे.
गुजरातमध्ये उ.प्रदेश,बिहारच्या हजारो लोकांना पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत?
भागवतांनी असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते.
भय्याजी जोशींनीही मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे असं विधान केलं होतं.
मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे,पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये.
आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा.
यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका.
All Shows


































