Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्यं करायची आणि नंतर माफी मागून विषय थंड करण्याचा प्रयत्न करायचा, हे प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेत. आपल्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेलं वक्तव्य हा त्याच मालिकेतला आणखी एक भाग. या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात बघता बघता संतापाची लाट उसळली आणि विरोधकांनी बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलनांना सुरुवात केली. गेल्या दोन दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
(बागेश्वर बाबा - छत्रपती शिवाजी महाराज थक गये युद्ध कर कर के. उनको लगा की हम थक गये. एक दिन स्वामी समर्थ रामदासकी के पास गये.
संजय राऊत - ते जे बुवा आहेत, तरुण कुणीतरी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं.
हर्षवर्धन सपकाळ - तुम्हाला लाज आणि शरम वाटली पाहिजे. सांगणारा तर विकृत आहेच. पण ऐकणारेदेखील बशरम आहेत.
अमोल कोल्हे - उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधेर छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही.))
व्हिओ -
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा नख लावण्याचा प्र्कार घडलाय.
निमित्त होतं शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाचं.
भारदुर्गा शक्तीस्थळ शीलान्यास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबाबत असं एक वक्तव्य केलं, ज्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली...
All Shows































