Sanjay Shirsat | हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून शिरसाट बाहेर,आरोप करणाऱ्यांनी फायदा करुन घ्यावा
विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांनी थेट इशारा दिलाय। हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून संजय शिरसाट आता बाहेर पडतायत। उद्या माझा मुलगा निविदा प्रक्रियेतून बाहेर पडेल अशी घोषणाच शिरसाटांनी केली आहे। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा असं शिरसाटांनी म्हटलंय। सात वेळा लिलावाची नोटीस काढली कोणी पुढे आलं नाहीत। सदुसष्ठ कोटींना संजय शिरसाट हे हॉटेल घेणार होते। संजय राऊत तुम्ही लक्ष ठेवा मी थोडा चक्रम माणूस आहे। घराला आग लावायला कमी करणार नाही। असा इशाराही शिरसाटांनी दिलाय। तुम्हाला मी एक आव्हान देतो. एकशे बारा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ठ कोटी घेतलेली आहे म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला? आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरला सांगतोय विड्राव्ह हा त्याच्यातून अं आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येतंय तुमी भरा। एकशे दहाचं आहे ना शंभर ला भरा। दहा कोटीचा फायदा होईल तुमचा। नव्वद ला भरा। वीस कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन। तर शिरसाट जर हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडले तर त्यांना वीस लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। कारण लिलावातील अटी पाळल्या नाहीत तर अनामत रक्कम जप्त होण्याची तरतूदच लिलाव प्रक्रियेत आहे। याबद्दल संभाजीनगरचे एसडीएम व्यंकट राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। या हॉटेलचे आमच्याकडे ताब्यात येण्यापूर्वी मालक होते रमेश हवेली नावाचे एक व्यक्ती होते। त्यांचे एक धनदा कॉर्पोरेशन म्हणून कंपनी होती। त्या कंपनीच्या मालकीचं हे हॉटेल होतं। त्या-त्या व्यक्तीने रमेश हवेली यांनी ठेवीदाराचे पैसे बुडवले म्हणून- ठेवीदार कशा आले या हॉटेल मधून? त्यांनी अअअ त्यांच्या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केले होते। ठेवीदार होते त्यांचे पैसे त्यांनी बुडवले। त्याच्यामुळे एमपीआयडी अॅक्टनुसार जर ठेवीदाराचे पैसे गुंतवणूकदाराचे पैसे जर कोणी बुडवत असेल तर त्यांची प्रॉपटी आपण जप्त करतो आणि त्या प्रॉपटीचा लिलाव करून ते ठेवीदाराचे पैसे वापस करण्याची तरतूद आहे। दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यामध्ये आपण घेतली सातवी फेरी। यामध्ये चौसष्ट कोटी त्रेपन्न लाख ही किंमत ठेवण्यात आली होती। मग यामध्ये कोण सहभागी झाले आणि हे कोण आहेत? यामध्ये तीन अअअ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे या ऑक्शनची त्याच्यावर आम्ही ही निविदा ऑक्शन काढलं होतं। त्यामध्ये तीन कंपन्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं त्यांनी डीडी भरलं अअअ इयमडी भरली आणि त्याच्यानंतर त्यानुसार वीस तारखेला लिलावाची प्रक्रिया पूर्ण पडली। यामध्ये सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्यूरमेंट एक कंपनी आहे। त्यानंतर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम एलएलबी ही एक कंपनी आहे आणि कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड ही तिसरी कंपनी। या तीन कंपनीने दिनांक वीस मे रोजी ऑक्शन मध्ये बोली लावली होती। सर्वाधिक बोली? सर्वाधिक बोली ही सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्यूरमेंट कंपनीने जी आहे त्यांनी चौसष्ट कोटी ब्याऐंशी लाख रुपये ही सर्वाधिक बोली लावली आहे। आता याची पुढची प्रक्रिया काय आहे? जी, जी कंपनी किंवा जो व्यक्ती हायएस्ट बोली लावतो त्यांना पंचवीस दिवस सॉरी जी बोलीची जी रक्कम आहे त्याच्या पंचवीस टक्के रक्कम ही तीस दिवसांमध्ये भरावी आमच्याकडे भरावी लागते आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही पुढच्या तीन महिन्यांमध्ये भरावी लागते जर यांनी वेळेत जर पंचवीस टक्के रक्कम जर वेळेत भरली नाही किंवा तर उर्वरित पंचवीस पंच पंच्याहत्तर टक्के रक्कम भरली नाही तर त्यांचा जो आमच्या सोबत जो ऑक्शनचा जो क्लेम आहे तो त्यांचा क्लेम अअअ संपुष्टात येतो आणि त्यांनी जी इयमडी आमच्याकडे भरलेली आहे किती रुपयांची इयमडी आहे? वीस लाखांची इयमडी आहे ती आम्ही जप्त करून येऊ

































