Anandache Pan | ‘कसं हुईन तं हू माय…’ पुस्तकाच्या लेखिका अमृता खंडेराव यांची संपूर्ण मुलाखत
Anandache Pan | ‘कसं हुईन तं हू माय…’ पुस्तकाच्या लेखिका अमृता खंडेराव यांची संपूर्ण मुलाखत
प्रत्येक जिल्ह्यातले तिच्यातले शब्द, बारकावे, अनेक गोष्टी वेगळ्या आहेत, तर हे पुस्तक जे आहे, कस होईं त हु माय, हे पर्टिकुलरली बुलढाणा जिल्ह्यातल्या वराडी बोलीत लिहिलेल पुस्तक आहे. बुलढाण्याच्या ग्रामीण भागातले लोक जी भाषा बोलतात, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी बोली वापरतात त्या वराडी बोलीतल हे पुस्तक आहे. आता कस? खूप महिला सुशिक्षित झाल्या आणि समाज बदलला वगैरे पण जेव्हा तुम्ही विदर्भाच्या ग्रामीण भागात येता त्यावेळेस जर तुम्ही चार दिवस या खेड्यामध्ये राहिले एखाद्या कुटुंबात आणि जरा फिरून बघितलं तर या महिलांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांना खूप दर्जेदार शिक्षण मिळालेल नाही. त्यांचं कौशल्य विकासाचे कार्यक्रम त्यांच्यासाठी कोणी राबवलेले नाहीत. त्यामुळे त्यांच जे आयुष्य आहे त्यात जे काही पारंपरिक स्त्री जीवन होतं भारतातलं तर त्या पद्धतीने त्यांच आयुष्य चालले महाराष्ट्र महाराष्ट्रातल म्हणा किंवा भारतातल म्हणा हे जे त्यांच जीवन आहे त्या पद्धतीने त्यांच आयुष्य सुरू आहे एक साध उदाहरण मी सांगते की रविवारी किंवा अधून मधून कुटुंबामध्ये मटन बनवलं जातं पाच जणांच कुटुंब असेल तर समजा एक किलो मटन आणले रविवारी तर मग ती जी बाई आहे घरातली सून आहे महिला आहेत त्या तर त्या सगळ्याजणी मिळून ते खूप. पिढीला, नवीन पिढीला घडवती आहे, ज्याला जन्म देती आहे, तुमचं वंश चालवती आहे, तिच्या साध्या रोजच्या भुकेचा सुद्धा विचार केला जात नाही. ही जी आहे प्रतवारी ती तशीच आहे. घराघरात आजही म्हणजे पहिल्यांदा पुरुष जेवणार आहेत, नंतर घरातल्या मोठ्या महिला जेवणार आहेत आणि नंतर सुना. ही उत्तरंड अशी अशी त्यात काहीही विदर्भात फरक पडलेला नाहीये. शिक्षणान काय फरक पडलाय तर ब्लाऊजचा गळा बदललाय, ब्लाऊजच्या गळ्यात फरक पडलाय साडी. कस झाले की जी प्रसार माध्यम आहेत तर ती सगळीच काही गरीब महिलांच्या हातात नसतात पण टीव्ही समजा तर टीव्ही बघितल्यानंतर ती बाई एक वेगळ चकचकीत विश्व रोज बघते समोर ग्रामीण भागातली आमची महिला आणि तिच्या आयुष्याची जेव्हा ती ते कंपेअर करते त्यावेळेस त्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही ती तस आयुष्य जगायची कल्पनाच करू शकत नाहीये तिच्या आनंद कशात बघा आता आमचं भोसागाव मी भोसा गावात राहते भोसच्या एखाद्या ढोरासारख आयुष्य त्यांच, त्यांच्या आयुष्यात आणि ढोराच्या आयुष्यात काहीच फरक नाहीये. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून जे कष्ट आहेत ते रात्री अंग टाकल्यानंतरच कळत की आपले हाड दुखतायत किंवा त्या आंघोळीला माझे माझ्याकडे मदतनीस बायका येतात खेड्यावरून त्या म्हणतात की आंघोळीला बसलं की हाड बोलतात. हाड बोलतात म्हणजे गरम पाणी अंगावर पडल्यावर ते दुखत ते जाणवत. तिथपर्यंत वेळच नसतो स्वतःकडे बघायला. तर अशा या महिलांच्या आयुष्याबद्दल हे पुस्तक.
All Shows































