एक्स्प्लोर

World Cup 2019 | विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी

श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे.

लीड्स : विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्लेवर खेळवण्यात येईल. भारतीय संघानं आठपैकी सहा सामने जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. श्रीलंकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धचा हा सामना म्हणजे टीम इंडियासाठी उपांत्य फेरीची पूर्वतयारी ठरणार आहे. भारताची मधली फळी विश्वचषकात सातत्यानं अपयशी ठरली आहे. मधल्या फळीच्या फलंदाजांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या सामन्यात संधी मिळणार आहे. स्ट्राईक रेट उंचावण्यात अपयशी ठरलेल्या धोनीला सूर मिळणं हे टीम इंडियाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे. विश्वचषकातल्या आठपैकी सहा सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं गमक आहे. पण असं असलं तरी भारतीय संघव्यवस्थापनाला उपांत्य फेरीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चिंता सतावत आहे. ती म्हणजे मधल्या फळीचं अपयश. मधल्या फळीतल्या केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक या शिलेदारांना मोक्याच्या क्षणी मोठी खेळी उभारण्यात अपयश आलंय. त्यामुळे अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. सुदैवानं मधल्या फळीची ही कसर गोलंदाजांनी भरुन काढली आणि इंग्लंडविरुद्धचा अपवाद वगळता टीम इंडियाला उर्वरित सामन्यात विजय साजरा करता आला. केदार जाधवनं या विश्वचषकात 3 डावांत 80, धोनीनं सात डावांत 223, आणि हार्दिक पंड्याला सात डावांत 187 धावाच करता आल्या आहेत. धवनच्या दुखापतीनंतर लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाली. पण त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या रिषभ पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली ही आघाडीची फळी आपली कामगिरी चोख बजावताना दिसत आहे. म्हणूनच उपांत्य फेरीत या आघाडीच्या फलंदाजांना मधल्या फळीची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीआधी मधल्या फळीच्या या प्रश्नावर  भारतीय संघव्यवस्थापन काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Maharashtra Kesari Final :मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
Australia : ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  
ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget