एक्स्प्लोर

पराभवानंतर टीममध्ये बदल करु नको, गांगुलीचा कोहलीला सल्ला

पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या.

बर्मिंगहॅम : एजबॅस्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यात अंतिम अकरामध्ये बदल न करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. तर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक निर्धाराने खेळण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सौरव गांगुलीने लिहिलं आहे की, "जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रत्येकाला धावा कराव्या लागतील. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना होता आणि मला वाटतं की, मालिकेत चांगली कामगिरी करुन पुनरागमन करण्याची क्षमता संघात आहे. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयला अधिक निर्धाराने खेळायला हवं, कारण याआधीही त्यांनी अशा परिस्थिती धावा केल्या आहेत." गांगुली पुढे म्हणाला की, "पराभवासाठी कर्णधार जबाबदार आहे, असं मला वाटत नाही. जर तुम्ही कर्णधार असाल तर जसं विजयासाठी तुमचं कौतुक होतं, तसंच पराभवासाठी तुमच्यावर टीकाही होते. फलंदाजांना संघाबाहेर करण्याआधी त्यांना आवश्यक संधी द्यायला हवी, यासाठीही कोहलीवर टीका होते. इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंगसमोर अपयश येणं हे कारण आता असू शकत नाही. कारण प्रत्येकाला माहित आहे की, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो." "हे खरं आहे पण अंतिम अकरामध्ये छेडछाड आणि बदल केल्याने खेळाडूंच्या मनात अशीही भीती निर्माण होऊ शकते की, एवढ्या वर्षांनंतरही ते संघ व्यवस्थापनाचा भरवसा मिळवण्यात अपयशी ठरले. खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं महत्त्वाचं आहे," असंही गांगुली म्हणाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget