एक्स्प्लोर

पराभवानंतर टीममध्ये बदल करु नको, गांगुलीचा कोहलीला सल्ला

पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या.

बर्मिंगहॅम : एजबॅस्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यात अंतिम अकरामध्ये बदल न करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. तर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक निर्धाराने खेळण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सौरव गांगुलीने लिहिलं आहे की, "जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रत्येकाला धावा कराव्या लागतील. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना होता आणि मला वाटतं की, मालिकेत चांगली कामगिरी करुन पुनरागमन करण्याची क्षमता संघात आहे. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयला अधिक निर्धाराने खेळायला हवं, कारण याआधीही त्यांनी अशा परिस्थिती धावा केल्या आहेत." गांगुली पुढे म्हणाला की, "पराभवासाठी कर्णधार जबाबदार आहे, असं मला वाटत नाही. जर तुम्ही कर्णधार असाल तर जसं विजयासाठी तुमचं कौतुक होतं, तसंच पराभवासाठी तुमच्यावर टीकाही होते. फलंदाजांना संघाबाहेर करण्याआधी त्यांना आवश्यक संधी द्यायला हवी, यासाठीही कोहलीवर टीका होते. इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंगसमोर अपयश येणं हे कारण आता असू शकत नाही. कारण प्रत्येकाला माहित आहे की, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो." "हे खरं आहे पण अंतिम अकरामध्ये छेडछाड आणि बदल केल्याने खेळाडूंच्या मनात अशीही भीती निर्माण होऊ शकते की, एवढ्या वर्षांनंतरही ते संघ व्यवस्थापनाचा भरवसा मिळवण्यात अपयशी ठरले. खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं महत्त्वाचं आहे," असंही गांगुली म्हणाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
Latur News : विम्याच्या पैशासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, वद्धाच्या जीववर बेतला Special Report
Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget