Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या सत्रातील आपला तिसरा विजय मिळवताना  पंजाब किंग्सला (Punjab Kings) 9 धावांनी पराभूत केले. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्थशतक झळकावत एक वेळ पंजाबच्या विजयाचे चित्र निर्माण केले; परंतु जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व गेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करत मुंबईला विजयी केले.


मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकामुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पंजाबच्या 14 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने पंजाबसाठी चांगली खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात दोघांना अपयश आले. मुंबईच्या या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे.  याआधी हार्दिक पांड्याने कर्णधारपद योग्यरित्यान हाताळल्याने, तसेच बुमराहला शेवटचे षटक न देता स्वत: शेवटचे षटक टाकल्याने इरफान पठाणने टीका केली होती.  


इरफान पठाण काय म्हणाला?


हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून सक्रिय होता आणि त्याने जसप्रीत बुमराहला 13 वे षटक देऊन सामनाच बदलून टाकला. बुमराहला शेवटच्या षटकांसाठी ठेवले नाही. हार्दिकने तसे केले असते, तर मुंबई इंडियन्सने सामना तेथेच गमावला असता, कारण पंजाबकडून शशांक स्फोटक फलंदाजी करत होता. बुमराहला 13वे षटक दिलं, तेथेच मुंबईने सामना जिंकला, असं म्हणत इरफान पठाणने कौतुक केलं. 


मुंबईचा विजय-


मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या. संघासाठी सूर्यकुमार यादवने 53 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा संघ 19.1 षटकांत 183 धावांवर सर्वबाद झाला.


आयपीएलच्या गुणतालिकेची स्थिती काय?


गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले असून, त्यानंतर त्यांचे 12 गुण झाले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रनरेट +1.399 आहे, चेन्नईचा +0.726 आणि हैदराबादचा +0.502 आहे. लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे, दिल्लीचा आहे -0.074 आणि मुंबई इंडियन्सचा -0.133 आहे. यानंतर पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूचे 2 गुण आहेत. 


संबंधित बातम्या:


शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video


आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!


पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?