एक्स्प्लोर
Advertisement
बुमराच्या 5 विकेट्स, श्रीलंकेला 217 धावांवर रोखलं
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
कॅण्डी : भारताच्या जसप्रीत बुमराने 27 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून, कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेला नऊ बाद 217 धावांत रोखलं. त्यामुळे हा सामना आणि मालिकाही जिंकायची, तर टीम इंडियासमोर 50 षटकांत 218 धावांचं लक्ष्य आहे.
लहिरू थिरीमनेच्या 80 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर पुन्हा नांगी टाकली. त्यात जसप्रीत बुमराने पाच विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेतही चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता.
भारत आणि श्रीलंका संघांमधला तिसरा वन डे सामना कॅण्डीच्या मैदानात खेळवला जात आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असली, तरी श्रीलंकेला कमी लेखता येणार नाही. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत तर धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीमुळेच टीम इंडिया पराभवाच्या संकटातून बालंबाल बचावली.
दम्बुलापाठोपाठ कॅण्डीच्या वन डेतही विजय साजरा करुन विराट कोहलीच्या फौजेने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका संघ कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर तिसऱ्या वन डेत पुन्हा आमनेसामने आला आहे. ही वन डे जिंकून टीम इंडियाला पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची नामी संधी आहे.
हळदीच्या अंगाने मैदानात, धनजंयच्या 6 विकेट्स मागची कहाणी
कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलने श्रीलंकेची फलंदाजी ही कचकड्याची असल्याचं दाखवून दिलं. पण त्यानंतर अकिला धनंजयने दिलेले धक्के लक्षात घेता टीम इंडिया श्रीलंकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही.'विघ्नहर्ता' भुवनेश्वर 53*, संकटमोचक धोनी 45*, भारताचा विजय!
धोनीच्या या कामगिरीने त्याच्यातला टीम इंडियाचा विघ्नहर्ता, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं तर त्याच्यातला मॅचफिनिशर अजूनही जागता असल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारनं सरळ बॅटनं खेळून झळकावलेलं नाबाद अर्धशतक हे त्याच्यातल्या फलंदाजांची सुखद जाणीव करून देणारं ठरलं.टीम इंडियाचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय, धोनी ठरला मॅचफिनिशर
धोनी आणि भुवी या जोडीनं प्रतिकूल परिस्थितीत रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं टीम इंडियाला नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. हा आत्मविश्वास विराटच्या फौजेला तिसऱ्या वन डेसह मालिका जिंकून देण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरु शकेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्राईम
पुणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets