एक्स्प्लोर

Year Ender 2020: यावर्षी 'या' दिग्गज खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

यावर्षी अनेक दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. यावर्षी कोणत्या मोठ्या खेळाडूंनी क्रिकेटला निरोप दिला आहे ते जाणून घेऊया.

Year Ender 2020 | क्रिकेटच्या बाबतीत वर्ष 2020 इतके चांगले नव्हते. यावर्षी कोरोना साथीमुळे आयपीएल वगळता कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा पार पडली नाही. 2020 टी -20 वर्ल्ड कपमधील अनेक द्विपक्षीय मालिका कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या. यावर्षी मर्यादित क्रिकेटच्या दरम्यान अनेक दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. यावर्षी कोणत्या मोठ्या खेळाडूंनी क्रिकेटला निरोप दिला आहे ते जाणून घेऊया.

इरफान पठाण

आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेल्या इरफान पठाणने 04 जानेवारी, 2020 रोजी क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली. इरफानला बर्‍याच दिवसांपासून संघात पुनरागमन करण्याची अपेक्षा केली होती आणि आठ वर्ष संघातून बाहेर राहिल्यानंतर त्याने क्रिकेटला निरोप दिला. इरफानने भारताकडून 29 कसोटी आणि 120 एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये त्याने कसोटीत 100 आणि एकदिवसीय सामन्यात 173 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 टी -20 विश्वचषक जिंकण्यात इरफानने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महेंद्रसिंह धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयसीसीचे सर्व विजेतेपद जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून गणला जातो. सुमारे 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने 350 एकदिवसीय सामन्यात 10,777 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 90 कसोटी सामन्यात 4876 आणि 98 टी-20 सामन्यात 1617 धावा केल्या.

सुरेश रैना

धोनीच्या निवृत्तीनंतर फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीने 5615 धावा केल्या. याशिवाय रैनाच्या नावे 18 कसोटी सामन्यात 768 धावा आणि 78 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,605 धावा आहेत. टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात रैना शतक करणारा एकमेव भारतीय आहे.

मार्लन सॅम्युअल्स

मार्लन सॅम्युएल्सने 2000 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षाचा असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजाने संघाला दोन टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावर्षी नोव्हेंबरमध्ये सॅम्युअल्सने क्रिकेटला निरोप दिला. वेस्ट इंडीजकडून 71 कसोटी सामन्यात 3917 धावा आणि 41 विकेट घेतल्या. तर 207 एकदिवसीय सामन्यात 5606 धावा आणि 89 विकेट आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1611 धावा आणि 22 विकेट घेतले.

मोहम्मद आमिर

वसिम आक्रम आणि वकार युनिसच्यानंतर पाकिस्तानचा सर्वात प्रतिभावान वेगवान गोलंदाज मानला जाणारा मोहम्मद आमिर याने या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना चकित केले. संघ व्यवस्थापनावर गंभीरपणे आरोप करत त्याने 17 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. 28 वर्षीय आमिरने पाकिस्तानकडून 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये 81 तर 50 टी-20 सामन्यांत 59 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने 36 कसोटी सामन्यांमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget