एक्स्प्लोर

WTC Final: पावसानंतर भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायला हवा होता, निवड समितीच्या व्यक्तीचे मोठे विधान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आठ विकेट्सने जिंकला. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं.

WTC Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आठ विकेट्सने जिंकला. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं. अनेकांनी भारत चुकीच्या बॉलिंग कॉम्बीनेशनसह मैदानात उतरल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंग यांनीही यावर आपले मत मांडले आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळवले गेले नाही ही मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शार्दूल हा 15 सदस्यीय संघात नव्हता, त्यामुळे पाऊस झाल्यानंतर साऊथॅम्प्टनमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करता आले नाही.

यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाच्या विजयानंतर सरनदीप यांचा कार्यकाळ संपला होता. डब्ल्यूटीसी फायनल आणि चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भुवनेश्वरची निवड न करणे निराशाजनक असल्याचे त्याने सांगितले.

सरनदीप म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी प्लेइंग इलेव्हनची निवड झाली होती, त्यामध्ये दोन फिरकी गोलंदाजांची उपस्थिती चांगली होती. पण, यात बदल करायला हवा होता. कारण (पाऊस पडल्यानंतर) वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल बनली होती."

WTC 2021 : सचिन तेंडुलकरने सांगितले जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवाचे कारण

"तुम्ही दोन फिरकीपटू (रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा) निवडले. कारण ते फलंदाजी करू शकतात. मात्र, फलंदाजी करणारा एकमेव वेगवान गोलंदाज शार्दुल आहे आणि तो 15 सदस्यीय संघातही नव्हता. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतो किंवा नाही. पण, त्याला 15 सदस्यीय संघात असायला हवे होते."

पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नेमलेल्या भुवनेश्वरच्या संदर्भात सरनदीप म्हणाले की, इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या संघात वेगवान गोलंदाजांची निवड व्हायला हवी होती. "भुवनेश्वरला इंग्लंड घेऊन न जाणे ही मोठी चूक आहे. तो आपला सर्वोत्तम स्विंग गोलंदाज आहे आणि तरीही तो संघात नाही,"

शार्दुलसारख्या एखाद्या वेगवान गोलंदाजाला अष्टपैलू म्हणून पारखण्याची वेळ आली आहे, असे सरनदीप यांनी सांगितले. कारण हार्दिक पंड्या कसोटी फॉरमॅटमध्ये गोलंदाजीसाठी फिट नाही. ते म्हणाले, "तुम्ही फक्त हार्दिकवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व फॉर्मेटमध्ये तो गोलंदाजीसाठी कधी फिट असेल हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे शार्दुलसारखा कोणी तयार होणे आवश्यक आहे किंवा विजय शंकर किंवा शिवम दुबे देखील तिथे आहेत,"

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजला नियमित संधी मिळेल अशी आशा सरनदीप यांनी व्यक्त केली. सिराजला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. त्याने जितके शक्य तितके सामने खेळायला हवेत. तो चांगली गोलंदाजी करीत आहे. जर त्याला संधी मिळाली नाही तर त्याला योग्य लेंथ आणि लांबीसह गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते."

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget