Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे.

Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डावाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटाला दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.
नेमकं काय घडलं? (Why Rishabh Pant Retires Hurt News)
ऋषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर 15 चेंडूंमध्ये 3 धावा करून खेळत होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याने टाकलेल्या एका वेगवान आणि धोकादायक शॉर्ट बॉलवर पंतने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला न लागता ग्लोव्हला लागला. या चेंडूचा फटका पंतच्या मनगटाच्या हाडाला बसल्याचे दिसून आले. चेंडू लागताच पंत वेदनेने त्रस्त झाला. त्याने तातडीने हाताकडे पाहिले आणि फलंदाजी सुरू ठेवणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे स्पष्ट झाले.
फिजिओ लगेच मैदानात धावले अन्... (Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test)
यानंतर भारतीय संघाचा फिजिओ लगेच मैदानात धावून आला. पंतच्या मनगटावर बर्फ लावण्यात आला. त्याच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली. काही वेळ उपचार केल्यानंतर त्याच्या मनगटाला टेपही लावण्यात आली. मात्र, काही वेळाने ती टेप काढण्यात आली आणि पंचांनीही पंतची स्थिती तपासली. दुखापतीनंतर बराच वेळ मैदानावर उपचार सुरू होते. अखेर पंतला पुढे फलंदाजी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडले. त्याच्या जागी अष्टपैलू रविंद्र जडेजा फलंदाजीला आला.
पंतची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मनगटावर थेट चेंडू आदळल्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे भारतासाठी या कसोटी सामन्याचे महत्त्व मोठे असून, पंत हा संघातील प्रमुख फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. त्यामुळे तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामन्याद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळ सुरू असून, 61 षटकांनंतर भारताने 3 विकेट गमावत 218 धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल 81 धावांवर तर रविंद्र जडेजा 8 धावांवर नाबाद आहे.
हे ही वाचा -




















