एक्स्प्लोर

T20 World Cup 2021 : आजपासून टी-20 विश्वचषकाचा शुभारंभ; क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये आज दोन सामने

T20 World Cup 2021 : आजपासून टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होत असून आजपासून क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये दोन सामने खेळवण्यात येणार आहेत.

T20 World Cup 2021 : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा संपली असली तरी यूएई (UAE) आणि ओमानमधील (Oman) क्रिकेटचा उत्साह अबाधित राहील. फरक एवढाच आहे की, लीग क्रिकेटच्या युगातून आता हे जगातील टी 20 वर्चस्वाच्या युद्धात बदलेल. जगभरातील सर्व क्रिकेटपटू, जे आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाच संघात सोबत खेळताना दिसले होते, ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना कोणतीही कसर सोडणार नाहीत. आयसीसी टी-20 विश्वचषक आजपासून (17 ऑक्टोबरपासून) यूएई आणि ओमानमध्ये सुरु होत आहे. आज म्हणजेच, 17 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा (Qualifier Round) पहिला सामना ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळला जाईल. तर 14 नोव्हेंबर रोजी दुबईत (Dubai) खेळल्या जाणाऱ्या अंतिम (Final) सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.

भारत (Team India) 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) महान सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

कोविड -19 मुळे स्पर्धा स्थलांतरित

शेवटचा टी -20 विश्वचषक 2016 मध्ये भारतात खेळला गेला. यंदाही ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली. बीसीसीआय (BCCI) या स्पर्धेचे यजमान आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला (वेस्ट इंडीज) आपल्या जेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान असेल. जर ते यात यशस्वी झाले, तर असे करणारा तो जगातील पहिला संघ असेल. दोन वेळा हे जेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज हा जगातील एकमेव संघ आहे. या वर्षी या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम जाणून घेऊया.

या मैदानावर सामने खेळले जातील

यंदाचे टी -20 विश्वचषक सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला जाईल.

स्पर्धा तीन टप्प्यात खेळली जाईल

या वर्षी हा टी-20 विश्वचषक तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळला जाईल. मुख्य स्पर्धा सुपर 12 (Super 12) स्वरूपात खेळली जाणार आहे. ज्यासाठी भारतासह आठ अव्वल संघ आयसीसी रँकिंगच्या (ICC Ranking) आधारे आधीच पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम, टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आठ संघ पात्रता सामने खेळताना दिसतील. हे आठ संघ गट अ  (Group A) आणि गट ब (Group B) मध्ये विभागले गेले आहेत.

17 ऑक्टोबर रोजी यजमान ओमान आणि पापुआ न्यू गिनी (PNG) यांच्यात ब गटातील पहिल्या पात्रता सामन्यासह स्पर्धेची सुरुवात होईल. त्याच गटाचा दुसरा सामना त्याच दिवशी स्कॉटलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. तर ग्रुप बीमध्ये, आयर्लंड-नेदरलँड्स आणि श्रीलंका-नामिबिया यांच्यातील सामने 18 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये खेळले जातील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील.

23 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरु

टी -20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वालिफायर फेरीनंतर त्यात ग्रुप बी चा विजेता संघ आणि ग्रुप ए चा उपविजेता संघ असेल. तर गट 1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. क्वालिफायर फेरीनंतर, गट अ चा विजेता संघ आणि गट ब चा उपविजेता संघ देखील समाविष्ट केला जाईल.

23 ऑक्टोबर रोजी, सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गट 1 मध्ये खेळला जाईल. 24 ऑक्टोबर रोजी ग्रुप 2 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. सुपर 12 चा शेवटचा सामना भारत आणि अ गटातील उपविजेता संघ यांच्यात पात्रता फेरीत खेळला जाईल.

उपांत्य फेरी 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी खेळली जाईल, अंतिम सामना 14 नोव्हेंबरला

यानंतर या स्पर्धेचा बाद फेरीचा टप्पा सुरू होईल. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. तर टी -20 विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीसाठी 15 नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

ही पॉइंट सिस्टीम असेल

टी -20 विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात विजेत्या संघाला दोन गुण दिले जातील. दुसरीकडे, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गट 1 आणि गट 2 मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

तुम्ही भारतात टी-20 विश्वचषक सामने कुठे पाहू शकता?

आपण स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर टी 20 विश्वचषक सामने थेट पाहू शकता. याशिवाय, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स एचडी चॅनेलवरही सामना थेट प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना डिस्ने हॉटस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर तुमच्या मोबाईलवर थेट पाहू शकता. क्रिकेट चाहत्यांनाही टी 20 वर्ल्डकपचा ​​आनंद थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. हे सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जातील.

आयसीसी टी -20 विश्वचषकाचे टीम इंडिया स्क्वॉड 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक

24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि क्वालिफायर्स (पात्रता फेरीत ब गटातील विजेता)
नोव्हेंबर 8: क्वालिफायर्स वि भारत (पात्रता फेरीत अ गटातील उपविजेता संघ)

उपांत्य फेरी आणि अंतिम वेळापत्रक

10 नोव्हेंबर: पहिली उपांत्य फेरी
11 नोव्हेंबर: दुसरी उपांत्य फेरी
14 नोव्हेंबर: फायनल
15 नोव्हेंबर: अंतिम फेरीसाठी राखीव दिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Embed widget