एक्स्प्लोर

Suryakumar Yadav Ind Vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण, म्हणाला, आम्ही फक्त...

Suryakumar Yadav Ind Vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: भारत पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं, याचं कारण सांगितलं आहे.

Suryakumar Yadav Ind Vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. 

हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण-

टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं, याचं कारण सांगितलं आहे. आमचे सरकार आणि बीसीसीआय, आम्ही एकत्र होतो. एकत्र, आम्ही इथे आलो, आम्ही एक निर्णय घेतला आणि मला असे वाटते की, आम्ही फक्त खेळ खेळण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही त्यांना (पाकिस्तानला) योग्य उत्तर दिले. आयुष्यात खेळाडूंच्या भावनेपुढे फार कमी गोष्टी असतात, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

सूर्यकुमार यादवे जिंकली भारतीयांची मनं-

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे भारताने सामना जिंकताच सूर्यकुमार यादवने सर्वांची मनं जिंकली. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

काय सांगतो ICC आणि ACC चा नियम?

क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा (Sportsmanship of Cricket) भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात.

टीम इंडियावर कारवाई होणार का?

हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाई प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जाणूनबुजून प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास, त्याला खेळभावनेच्या विरुद्ध कृती मानले जाते.

भारत-पाकिस्तान सामना कसा राहिला?

सामन्याचं चित्र असं होतं की सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला वेठीस धरलं. पहिल्याच षटकात विकेट मिळाल्यानंतर पाकिस्तानचा डाव दबावाखाली गेला. सलमान आगा याच्या निर्णयाने त्यांच्या संघाची वाट लावली. भारतीय फिरकी आणि वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज टिकूच शकले नाहीत. पाकिस्तानने कसाबसा 127 धावांचा टप्पा गाठला, पण हा स्कोर भारतासमोर काहीच नव्हता. भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून सामना एकतर्फी केल्यासारखं वाटू लागलं. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी शांत डोक्याने खेळ करत लक्ष्य सहज साध्य केलं. शेवटी 15.5 षटकांतच भारताने 3 गडी गमावत विजय मिळवला.

संबंधित बातमी:

Shoaib Akhtar Ind vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानला मिरची झोंबली, शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians :  मुंबई इंडियन्सने पूर्ण पगार दिला नाही, परदेशी खेळाडूचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Indians :  मुंबई इंडियन्सने पूर्ण पगार दिला नाही, परदेशी खेळाडूचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Ind vs Afg ODI Series: रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
IND vs AFG Test Series: पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Sairaj Bahutule Team India New Spin Coach: टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget