एक्स्प्लोर

IND vs BAN : सरफराज खानसह हे खेळाडू होणार संघाबाहेर; BCCI म्हणाली, तुम्हाला प्लेइंग-11मध्ये स्थान मिळाले नाही तर...

बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता कानपूरला पोहोचला आहे.

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता कानपूरला पोहोचला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND v BAN) 27 सप्टेंबरपासून यूपीच्या या शहरात खेळवला जाणार आहे. कानपूर कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या तीन खेळाडूंबाबत शंका निर्माण झाली आहे. हे तिन्ही खेळाडू बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणार नसून त्यांना संघातून सोडल्या जाऊ शकते असे बोलले जात आहे.

खंरतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवार 24 सप्टेंबर रोजी इराणी कप सामन्यासाठी रेस्ट ऑफ इंडिया टीमची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांची देखील निवड करण्यात आली आहे. म्हणजेच बीसीसीआयने हे दोन्ही खेळाडू इराणी कप सामना खेळणार असल्याची पुष्टी केली आहे, परंतु येथे गोंधळ असा आहे की बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या 16 सदस्यीय संघात या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण हे दोघे दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये नसतील तर ते इराणी कप खेळतील, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे बीसीसीआयनेही सरफराज खानबाबत माहिती दिली आहे. सरफराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, तर त्याला इराणी चषकासाठी राष्ट्रीय संघातूनही सोडले जाऊ शकते. तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचा भाग असू शकतो. बीसीसीआयने म्हटले आहे की, "सरफराज खानला दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कायम ठेवण्यात आले आहे. जर तो बांगलादेशविरुद्ध कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला नाही तर त्याला मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोडण्यात येईल." 

इराणी कप ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे आयोजित मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे. 2024 चा इराणी कप सामना मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात होणार आहे. हा सामना यावेळी 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 2023-24 रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील हा सामना लखनौच्या ऐतिहासिक एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने उर्वरित भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड यांची निवड केली आहे.

रेस्ट ऑफ इंडिया टीम - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs KKR Live Update IPL 2026 : आरसीबीने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; केकेआरच्या संघात महत्त्वाचा बदल
RCB vs KKR Live Update : आरसीबीने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; केकेआरच्या संघात महत्त्वाचा बदल
RCB vs KKR IPL 2026 : रायपूरमध्ये पावसाचा कहर; सामना रद्द झाला तर कोण जाणार प्लेऑफमध्ये? RCB-KKRचं धक्कादायक समीकरण समोर
रायपूरमध्ये पावसाचा कहर; सामना रद्द झाला तर कोण जाणार प्लेऑफमध्ये? RCB-KKRचं धक्कादायक समीकरण समोर
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL 2026 Orange Cap: विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?
विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
MPSC चा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा असतानाच अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
Embed widget