एक्स्प्लोर

Ranji Trophy: 'उत्तर प्रदेशच्या युवा खेळाडूंसोबत चुकीचं घडतंय' भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, रणजी स्पर्धेत चार संघ खेळवण्याची मागणी

Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 38 संघांनी सहभाग घेतलाय.

Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 38 संघांनी सहभाग घेतलाय. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश (uttar pradesh) स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे (uttar pradesh sports welfare association) अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री मोहसिन रझा (mohsin raza) यांनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या चार संघाला खेळवण्यात यावं, अशी त्यांनी बीसीसीआयकडं (BCCI) मागणी केलीय. लोकसंख्येचा विचार करता या स्पर्धेत उत्तर प्रदेशचा (uttar pradesh)  एक संघ पुरेसा नाही. महाराष्ट्र (maharashtra) आणि गुजरातचे उदाहरण देत त्यांनी उत्तर प्रदेशातही एकापेक्षा जास्त रणजी संघ (Ranji Trophy) असले पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलंय.

मोहसिन रझा (mohsin raza) यांनी पीटीआयसी (PTI) संवाद साधताना असं म्हटलंय की, “उत्तर प्रदेशमध्ये () चांगले युवा खेळाडू असतानाही त्यांना संधी मिळत नाही. महाराष्ट्र (maharashtra) राज्यातील महाराष्ट्र (maharashtra), विदर्भ आणि मुंबई (Mumbai) असे तीन संघ रणजीमध्ये खेळतात. तर, गुजरातकडून (Gujarat) सौराष्ट्र आणि बडोदा हे दोन संघ रणजीमध्ये सहभागी होतात. एकापेक्षा जास्त संघ असल्‍यानं अनेक खेळाडूंचा प्रतिभा समोर येईल. गुजरात (Gujarat), महाराष्ट्रासारखं (maharashtra) उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) चार संघ रणजीमध्ये खेळवले पाहिजेत". यासंदर्भात मोहसिन रझा यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहिलं आहे. 

Ranji Trophy: मुख्यमंत्र्यांकडं 'क्रीडा सल्लागार परिषद' स्थापन करण्याची शिफारस

मोहिसन रझा (mohsin raza) यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांची भेट घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 'क्रीडा सल्लागार परिषद' स्थापन करण्याची शिफारस केली. खेळाच्या विकासासाठी सल्ला देणं हा त्याचा उद्देश आहे. या 'क्रीडा सल्लागार समिती'मध्ये विविध खेळांतील ज्येष्ठ व अनुभवी खेळाडूंचा समावेश करावा, ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये महिला खेळाडूंचा विशेष समावेश असेल. 

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीचे  शेवटचे पाच विजेते संघ:

2021-22 मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
2019-20 सौराष्ट्र (Saurashtra)
2018-19 विदर्भ (Vidarbha)
2017-18 विदर्भ (Vidarbha)
2016-17 गुजरात (Gujarat)

इतर महत्वाच्या बातम्या:

Youtube Ads: जाहिरात आहे की चित्रपट! युट्यूबवर तब्बल एक तासाची जाहिरात, कंपनीचं उत्तर ऐकून तुमचं डोकं फिरेल

महत्त्वाच्या बातम्या

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget