एक्स्प्लोर

एकीकडं टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; दुसरीकडं 'पांडे'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ICC T20 World Cup 2022: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी  काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

ICC T20 World Cup 2022: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी  काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, याचदरम्यान कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेनं (Ishwar Pandey) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. टी20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर पांडेनं इंस्टाग्रामद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. 

ईश्वर पांडेला भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. दरम्यान, 2014 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, या दौऱ्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाकडून खेळण्याच्या प्रतिक्षेत असेलेल्या पांडेनं काल अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेताला. पांडेनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. 

ईश्वर पांडेनं इंस्टाग्राम पोस्ट- 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishwar pandey (@ishwar22)

 

ईश्वरचंद पांडेनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय?
इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वरचंद पांडेनं लिहिलंय की, “अखेर आज तो दिवस आला, मनावर दगड ठेवून मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय 2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाय. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचंही दु:ख आहे."

ईश्वरचंद पांडेची कारकिर्द
ईश्वरचंद पांडेनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं प्रतिनिधित्त्व केलंय. या 75 सामन्यांमध्ये त्याने 263 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. आयपीएलमध्ये त्यानं 25 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचंही प्रतिनिधित्व केलंय.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि आर अश्विन. स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget