IND vs WI, 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत तब्बल 311 रन स्कोरबोर्डवर लावले आहेत. ज्यामुळे भारताला आता विजयासाठी 50 षटकांत 312 धावा करायच्या आहेत. वेस्ट इंडीजकडून शाय होपने 115 धावा करत जबरदस्त शतक ठोकलं. तर कर्णधार पूरननेही 74 धावा ठोकल्या.






 


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. कर्णधार पूरनचा हा निर्णय़ अगदी योग्य ठरला असून विंडीजनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच कसरत घेतली. त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी कायम ठेवली. सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी दमदार अशी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्सने देखील 35 धावा ठोकत होपला साथ दिली. ज्यानंतर ब्रँडन किंग शून्यावर बाद झाला. पण कर्णधार पूरनने होपसोबत एक बलाढ्य भागिदारी उभारली. पूरन 74 धावा ठोकून तंबूत परतला. पण होपने फटकेबाजी सुरु ठेवली. 115 धावा करुन तो बाद झाला. पण तोवर विंडीजची धावसंख्या 300 पार गेली होती. ज्यामुळे आता भारताला 312 धावा विजयासाठी करायच्या आहेत. भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 तर हुडा, अक्षर आणि चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.  


भारत मालिकेत आघाडीवर


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.


हे देखील वाचा-