एक्स्प्लोर

भारत अन् बांगलादेशची कसोटी मालिका रंगणार; सुरेश रैनाच्या विधानाने टीम इंडियाची वाढली चिंता!

Ind vs Ban Suresh Raina: 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश या मालिकेला सुरुवात होणार आहे.

Ind vs Ban Suresh Raina: टीम इंडिया आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) या मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने टीम इंडिया बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश (Pak vs Ban) यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीत बांगलादेशचा संघ भक्कम दिसून आला. त्यामुळे आगामी मालिकेत बांगलादेशला टीम इंडियाने कमी लेखू नये, असा सल्ला सुरेश रैनाने दिला आहे. 

सुरेश रैना नेमकं काय म्हणाला?

एएनआयशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, आता नवीन कसोटी संघ तयार होणार आहे. बांगलादेशकडे चांगले फिरकीपटू आहे. बांगलादेशकडे अनेक चांगले खेळाडू आहेत जे बऱ्याच काळापासून चांगली कामगिरी करत आहेत. तसेच या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल, असं सुरेश रैना म्हणाला. त्यामुळे  बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन दौऱ्याची तयारी करता येईल, असंही सुरेश रैनाने सांगितले. सुरैश रैनाच्या या विधानाने टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC ची अंतिम फेरी गाठणार?

बांगलादेशनंतर भारतीय संघ मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. भारतीय संघापुढे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असणार आहे. 

पाकिस्तान आणि बांगलादेशचा पहिला कसोटी सामना कसा राहिला?

पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 448 धावांवर 6 विकेट गमावून डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने 141 आणि मोहम्मद रिझवानने 171 धावा केल्या. यानंतर बांगलादेशचा संघ 565 धावांवर ऑलआऊट झाला. मुशफिकुर रहीमने साडेआठ तासांहून अधिक काळ चाललेल्या मॅरेथॉन खेळीत 341 चेंडूंत एक षटकार आणि 22 चौकार मारून बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआउट केले आणि त्यांना विजयासाठी केवळ 30 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने 6.3 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला.

संबंधित बातमी:

'होय, माझं हार्दिक पांड्यावर प्रेम...'; बॉलिवूड अभिनेत्रीचं रोखठोक विधान, नेमकं काय म्हणाली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget