एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd Test 2024 : कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग... सामना रद्द झाला तर टीम इंडिला बसणार दणका, WTC पॉइंट टेबलमध्ये येणार खाली?

IND vs BAN 2nd Test 2024 Kanpur Weather Rain Forecast : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर येथे होणार आहे.

IND vs BAN 2nd Test 2024 Kanpur Weather Rain Forecast : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर येथे होणार आहे. हा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. मात्र हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंद्रदेव वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत, ते म्हणजे कानपूर कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे. कानपूर कसोटीत पाऊस खलनायक ठरला आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रद्द किंवा अनिर्णित राहिला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलवर कोणत्या संघाला मोठे नुकसान सहन करावे लागेल?  

कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग...

कानपूर कसोटी अनिर्णित राहिलेली तर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या टीम इंडियाच्या आशांनाही मोठा धक्का बसू शकतो. कानपूर कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. Accuweather च्या वृत्तानुसार, सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी पावसाची सर्वाधिक शक्यता 93% आहे. तर 28 आणि 29 सप्टेंबर रोजी 80 आणि 59 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कानपुक कसोटीचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेले, तर उरलेल्या दोन दिवसांत कसोटी सामन्याचा निकाल मिळणे कठीण आहे, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहू शकतो. या परिस्थितीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलची स्थिती काय असेल?

WTC पॉइंट टेबलची स्थिती?

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलनुसार, टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेश 39.29% गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातील. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या खात्यात केवळ 68.18% गुण शिल्लक राहतील. कानपूर कसोटीतील खेळपट्टीच्या अहवालानुसार, टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त आहे, जर भारताने दुसरी कसोटी जिंकली तर त्यांच्या खात्यात 74.24% गुण होतील.

टीम इंडियाला अजून किती कसोटी सामने खेळायचे आहेत?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी टीम इंडियाला 9 कसोटी सामने खेळावे लागतील. त्यापैकी संघाला 5 जिंकावे लागतील. कानपूर कसोटीनंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढणार आहेत.

कानपूरमध्ये टीम इंडिया कधी खेळली शेवटची कसोटी? 

भारतीय संघाने आपला शेवटचा सामना ग्रीन पार्क येथे नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, जो एक कसोटी सामना होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी अनिर्णित राहिली होती. आता बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीत टीम इंडियाचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

280 धावांनी  जिंकली चेन्नई कसोटी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला गेला होता. चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. चेन्नई कसोटी चौथ्या दिवशीच संपली.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget