एक्स्प्लोर

Ind vs Aus World Test Championship: जर अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाली तर टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचेल? संपूर्ण समीकरण जाणून घ्या

Ind vs Aus World Test Championship: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

Ind vs Aus World Test Championship: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) नऊ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला (Team Australia) विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे खेळाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात (3 मार्च) कांगारूंनी अगदी सहज गाठलं. आता दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघानं शानदार विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (2021-23) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता अहमदाबाद कसोटी जिंकणं भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघ जिंकला तर अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करेल. 

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास काय होईल? 

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहिला, तर टीम इंडियासमोर संकट येऊ शकतं. अशा स्थितीत श्रीलंकेसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपचे दरवाजे उघडतील आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकून ते अंतिम फेरीत पोहोचतील. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकली तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण, यासाठी टीम इंडिया देवाचा धावा करावा लागेल. कारण अशा परिस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपची फायनल गाठायची असेल, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकणं किंवा अनिर्णित ठेवणं गरजेचं आहे. तरच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. असं असलं तरी घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियानं गाठलीये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 

इंदूर कसोटी सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्या तरिही ऑस्ट्रेलिया फायनल्समध्ये आपल्या स्थानी स्थिर असेल. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pitch Rating : खेळपट्टी तयार करण्यात टीम इंडियाच्या हस्तक्षेपावर भडकला माजी क्रिकेटर, म्हणाला....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget