एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 | भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव : मेहबूबा मुफ्ती

विश्वचषकातील टीम इंडियाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडने भारतावर 31 धावांनी मात करुन, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला.

श्रीनगर : क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या विश्वचषकात भारताचा हा पहिला पराभव आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारताच्या पराभवासाठी भगव्या जर्सीला जबाबदार ठरवलं आहे. विश्वचषकातील टीम इंडियाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडने भारतावर 31 धावांनी मात करुन, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306 धावांचीच मजल मारता आली. या सामन्यानंतर भारताच्या पराभवानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता, पण या जर्सीनेच विश्वचषकातील भारताची विजयी घोडदौड रोखली. उमर अब्दुल्ला यांचाही सवाल तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही ट्वीट करुन भारताच्या पराभवावर प्रश्न उपस्थित केला आहे. "पाकिस्तान आणि इंग्लंडच्या जागी जर आपलं सेमीफायनलचं तिकीट पणाला लागलं असतं, तेव्हाही टीम इंडियाने अशीच फलंदाजी केली असती का? अबू आझमींचा विरोध दरम्यान, सपा नेते अबू आझमी यांनीही टीम इंडियाच्या भगव्या जर्सीला विरोध केला होता. ऑरेंज जर्सीमुळे भगवीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय जर्सीमध्ये भगवा रंग देऊ शकता, मग हिरवा का नाही? असा सवालही त्यांनी विचारला होता. भारतीय संघांच्या जर्सीला तिरंग्यातील रंग दिले असते काही हरकत नव्हती. मात्र प्रत्येक गोष्टीत भगवीकरण होत आहे, ते योग्य नाही. देशातील जनतेने याचा विरोध करायला हवा, असं अबू आझमी म्हणाले होते. ...म्हणून जर्सीचा रंग बदलला भारतासह अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघाच्या जर्सीचा रंगही निळा आहे. आयसीसीच्या नियमानुसार टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ एकाच रंगाची जर्सी घालून मैदानात उतरु शकत नाही. हा नियम फुटबॉलच्या 'होम आणि अवे' सामन्यात परिधान केल्या जाणाऱ्या जर्सीच्या धर्तीवर बनवण्यात आला आहे. इंग्लंडने भारताचा विजयरथ रोखला बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 306 धावांवर आटोपला. परिणामी भारताने हा सामना 31 धावांनी गमावला. मात्र या विजयामुळे इंग्लंडच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अजूनही शाबूत आहेत. या सामन्यात भारतीय संघ भगव्या आणि निळ्या रंगाची जर्सी परिधान करुन मैदानात उतरला होता. रोहित शर्माने झळकावलेलं शतक भारताच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ती जोडी फुटली आणि टीम इंडिया विजयापासून दूर राहिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget