एक्स्प्लोर

Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....

Ind Vs SA T 20 Final Match: भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यातील अश्रू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

Hardik Pandya in Final: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयाने भारतीय संघाचा विश्चचषक स्पर्धेतील (T 20 World cup) अनेक वर्षांचा दुष्काळ संपला. या सामन्यातील शेवटचे षटक भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकले. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा (Team India) तारणहार ठरला.

हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता. त्यामुळेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले.

अन् हार्दिक पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याला देण्यात आले होते. या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हार्दिकची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच मुंबई इंडियन्सच्या संघालाही लय सापडली नव्हती. या सगळ्यामुळे हार्दिक पांड्यावर तुफान टीका झाली होती. त्याचा फिटनेस, कामगिरी हे सगळे मुद्दे पुढे करत अनेकांनी हार्दिकचा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात समावेश व्हावा की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु, हार्दिक पांड्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र, काल अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिकने म्हटले.

आम्हाला कायम विश्वास होता, फक्त आमची रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणणे आणि शांत राहून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव आणण्याची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये गोलंदाजी केलेल्या पाच गोलंदाजांना विजयाचे श्रेय जाते. यावेळी गोलंदाजी करताना माझ्या कायम डोक्यात होते की, आपण शांत राहिलो नाही तर मला हवं ते करता येणार नाही. मला प्रत्येक चेंडू टाकताना 100 टक्के द्यायचे होते. मला नेहमीच दबावाखाली खेळायला आवडते, असे हार्दिक पांड्याने सांगितले.

आणखी वाचा

बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG 2nd ODI : रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Afg Matches 17 June : 17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?
17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?
India A squad Update : भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?
भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : भारताच्या खेडेगावातून आलेल्यांकडून काय अपेक्षा...; भरमैदानात वैभवच्या नको त्या कृत्यावर श्रीलंकन टीमच्या सदस्याचे वादग्रस्त वक्तव्य
भारताच्या खेडेगावातून आलेल्यांकडून काय अपेक्षा...; भरमैदानात वैभवच्या नको त्या कृत्यावर श्रीलंकन टीमच्या सदस्याचे वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
Embed widget