एक्स्प्लोर

Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....

Ind Vs SA T 20 Final Match: भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यातील अश्रू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

Hardik Pandya in Final: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयाने भारतीय संघाचा विश्चचषक स्पर्धेतील (T 20 World cup) अनेक वर्षांचा दुष्काळ संपला. या सामन्यातील शेवटचे षटक भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकले. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा (Team India) तारणहार ठरला.

हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता. त्यामुळेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले.

अन् हार्दिक पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याला देण्यात आले होते. या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हार्दिकची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच मुंबई इंडियन्सच्या संघालाही लय सापडली नव्हती. या सगळ्यामुळे हार्दिक पांड्यावर तुफान टीका झाली होती. त्याचा फिटनेस, कामगिरी हे सगळे मुद्दे पुढे करत अनेकांनी हार्दिकचा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात समावेश व्हावा की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु, हार्दिक पांड्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र, काल अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिकने म्हटले.

आम्हाला कायम विश्वास होता, फक्त आमची रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणणे आणि शांत राहून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव आणण्याची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये गोलंदाजी केलेल्या पाच गोलंदाजांना विजयाचे श्रेय जाते. यावेळी गोलंदाजी करताना माझ्या कायम डोक्यात होते की, आपण शांत राहिलो नाही तर मला हवं ते करता येणार नाही. मला प्रत्येक चेंडू टाकताना 100 टक्के द्यायचे होते. मला नेहमीच दबावाखाली खेळायला आवडते, असे हार्दिक पांड्याने सांगितले.

आणखी वाचा

बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget