एक्स्प्लोर

Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....

Ind Vs SA T 20 Final Match: भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यातील अश्रू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

Hardik Pandya in Final: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयाने भारतीय संघाचा विश्चचषक स्पर्धेतील (T 20 World cup) अनेक वर्षांचा दुष्काळ संपला. या सामन्यातील शेवटचे षटक भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकले. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा (Team India) तारणहार ठरला.

हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता. त्यामुळेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले.

अन् हार्दिक पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याला देण्यात आले होते. या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हार्दिकची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच मुंबई इंडियन्सच्या संघालाही लय सापडली नव्हती. या सगळ्यामुळे हार्दिक पांड्यावर तुफान टीका झाली होती. त्याचा फिटनेस, कामगिरी हे सगळे मुद्दे पुढे करत अनेकांनी हार्दिकचा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात समावेश व्हावा की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु, हार्दिक पांड्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र, काल अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिकने म्हटले.

आम्हाला कायम विश्वास होता, फक्त आमची रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणणे आणि शांत राहून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव आणण्याची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये गोलंदाजी केलेल्या पाच गोलंदाजांना विजयाचे श्रेय जाते. यावेळी गोलंदाजी करताना माझ्या कायम डोक्यात होते की, आपण शांत राहिलो नाही तर मला हवं ते करता येणार नाही. मला प्रत्येक चेंडू टाकताना 100 टक्के द्यायचे होते. मला नेहमीच दबावाखाली खेळायला आवडते, असे हार्दिक पांड्याने सांगितले.

आणखी वाचा

बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
Umesh Patil :
"पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी-अदानींची मुलं खासदार झाली असती!" विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर उमेश पाटलांचे सडेतोड उत्तर
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
Embed widget