एक्स्प्लोर

Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....

Ind Vs SA T 20 Final Match: भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यातील अश्रू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

Hardik Pandya in Final: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयाने भारतीय संघाचा विश्चचषक स्पर्धेतील (T 20 World cup) अनेक वर्षांचा दुष्काळ संपला. या सामन्यातील शेवटचे षटक भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकले. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा (Team India) तारणहार ठरला.

हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता. त्यामुळेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले.

अन् हार्दिक पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याला देण्यात आले होते. या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हार्दिकची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच मुंबई इंडियन्सच्या संघालाही लय सापडली नव्हती. या सगळ्यामुळे हार्दिक पांड्यावर तुफान टीका झाली होती. त्याचा फिटनेस, कामगिरी हे सगळे मुद्दे पुढे करत अनेकांनी हार्दिकचा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात समावेश व्हावा की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु, हार्दिक पांड्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र, काल अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिकने म्हटले.

आम्हाला कायम विश्वास होता, फक्त आमची रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणणे आणि शांत राहून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव आणण्याची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये गोलंदाजी केलेल्या पाच गोलंदाजांना विजयाचे श्रेय जाते. यावेळी गोलंदाजी करताना माझ्या कायम डोक्यात होते की, आपण शांत राहिलो नाही तर मला हवं ते करता येणार नाही. मला प्रत्येक चेंडू टाकताना 100 टक्के द्यायचे होते. मला नेहमीच दबावाखाली खेळायला आवडते, असे हार्दिक पांड्याने सांगितले.

आणखी वाचा

बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video

महत्त्वाच्या बातम्या

Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget