एक्स्प्लोर

Eng vs Ind 3rd Test : बुमराह लढला, पण शेवटच्या 3 विकेट्सनी ठोकल्या 116 धावा! इंग्लंडनं पहिल्या डावात उभारला 387 धावांचा डोंगर

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला.

England vs India 3rd Test Update : लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूट, जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑली पोप यांनी 44-44 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे पहिल्या डावात संथ फलंदाजी असूनही इंग्लंडचा संघ 400 धावांच्या जवळ पोहोचला. दुसरीकडे, गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराहने टीम इंडियाकडून 5 बळी घेतले. तर नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतला.

जो रूट आणि ऑली पोपची शतकी भागीदारी

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने गोलंदाजीत चांगली सुरुवात केली, कारण नितीश कुमार रेड्डी यांनी एकाच षटकात बेन डकेट आणि जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवून 44 धावांवर इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर जो रूट आणि ऑली पोप यांनी मिळून 109 धावा जोडल्या, ज्यामुळे इंग्लिश संघाने 150 धावांचा टप्पा ओलांडला. पोप 44 धावा काढून बाद झाला, त्यानंतर थोड्याच वेळात हॅरी ब्रूकही 11 धावांवर बाद झाला.

पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जो रूटने 99 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने 4 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा जसप्रीत बुमराहने स्टोक्सला 44 धावांवर क्लीन बोल्ड केले. स्टोक्सच्या काही वेळातच बुमराहने शतकवीर जो रूटलाही बाद केले. रूटने 104 धावा केल्या.

बुमराह लढला, पण शेवटच्या 3 विकेट्सनी ठोकल्या 116 धावा!

एकेकाळी इंग्लंडने 271च्या धावसंख्येत 7 विकेट गमावल्या होत्या. त्यांना 300-320 च्या धावसंख्येपर्यंत पोहोचणेही कठीण वाटत होते. अशा परिस्थितीत जेमी स्मिथने 51 धावा आणि ब्रायडन कार्सने 56 धावा केल्या. दोघांमधील 84 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठता आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या, पण गेल्या सामन्यात 10 विकेट घेणाऱ्या आकाशदीपला यावेळी एकही विकेट घेता आली नाही.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test : पहिल्या डावात फक्त 10 खेळाडू करणार फलंदाजी? ICC चा नियम अन् टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, कसे ते समजून घ्या

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Embed widget