एक्स्प्लोर

पुजारा, रहाणेवर टांगती तलवार; कसोटी संघातून बाहेर होण्याची शक्यता

जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चेतेश्वर पुजार आणि अजिंक्य रहाण या दोघांवर टांगती तलवार आहे.

मुंबई : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय कसोटी संघात बदलाची अटकळ बांधली जात आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील पराभवानंतर संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन दिग्गज खेळाडूंवर टांगती तलवार आहे.

वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी राजीनाम्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हेच भारतीय संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळली आहे. पण चेतेश्वर पुजाराने मागील 18 सामन्यात एकही शतकी खेळी केलेली नाही. याशिवाय चेतेश्वर पुजाराला स्लो स्ट्राईक रेटमुळेही टीकेचा धनी व्हावं लागतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पुजाराने खातं उघडण्यासाठी 35 चेंडू खेळून काढले.

विराट कोहली म्हणाला की, "आम्ही मागील काही वर्षांपासून जगातील सर्वात चांगला संघ म्हणून नावारुपाला आलोय. आम्ही आमच्या संघाचं रँकिंग खाली जाताना पाहू शकत नाही. आम्हाला खेळानुसा बदल करण्याची गरज आहे. लवकरच आम्ही मोठे निर्णय घेऊन. बदलासाठी एक किंवा दोन वर्षांची वाट पाहावी एवढा वेळ आमच्याकडे नाही."

केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता
विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट आहे की, चेतेश्वर पुजाराशिवाय अंजिक्य रहाणेच्या जागेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मेलबर्न कसोटीत शतक करणारा अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरोधात मोठी खेळी करण्यास अपयश ठरला आहे.

एका वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाला आता तरुण खेळाडूंना जास्त संधी द्यायची आहे. याशिवाय केएल राहुलचा शानदार फॉर्म पाहता आता भारतीय संघ त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी देऊ शकतो. याशिवाय  हनुमा विहारीलाही आता जास्तीत जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget