एक्स्प्लोर

पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?

india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला.

Babar Azam on india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान खडतर झालेय. त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश जर तर या स्थितीमध्ये पोहचलाय. पाकिस्तानला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, त्याशिवाय अमेरिकाचा दोन्ही सामन्यात पराभव व्हावा लागेल,  तरच पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा आहेत. त्यामुळे भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम याला राग अनावर झाला. सामन्यानंतर बोलताना बाबर आझम यानं पाकिस्तानच्या पराभवाचे कारण सांगितले.  

बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?

पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझम म्हणाला की, 'दहा षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार  गोलंदाजी केली. 120 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकांपर्यंत आम्ही सामन्यात होतो. आमची धावगतीही उत्तम होती. पण लागोपाठ विकेट पडल्याचा आम्हाला फटका बसला. ठरावीक अंतराने विकेट पडल्यामुळे अखेरच्या षटकात जास्त धावा राहिल्या. '

120 धावांचा पाठलाग करताना प्लॅन काय होता? या प्रश्नावर बोलताना बाबर आझम म्हणाला की, आमचा प्लॅन अतिशय सिम्पल होता. स्ट्राईक रोटेट करायचं. प्रत्येक षटकात 5 ते 6 धावा करायच्या. पण आमच्याकडून निर्धाव चेंडू जास्त गेले. त्याचा दबाव वाढत गेला. परिणामी आम्ही तीन विकेट झटपट गमावल्या.

तळाच्या फलंदाजांकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवू शकत नाही. आम्हाला पॉवरप्लेमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. आम्ही 6 षटकात 40-45 धावा करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. पण आम्हाला पॉवरप्लेचा फायदा घेता आला नाही. खेळपट्टी चांगली होती, चेंडू बॅटवर चांगला येत होता. काही वेळा चेंडू उसळी घेत होता. पण  ड्रॉप-इन खेळपट्टीवर असं होऊ शकतं, याचा अंदाज होताच, आम्ही एकेरी दुहेरी धावांवर भर द्यायला हवा होता, असे बाबर आझम म्हणाला.

एकूणच काय तर बाबर आझम यानं पराभवाचं खापर फलंदाजीवर फोडलं. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळेच पाकिस्तानला 120 धावांचा पाठलाग करता आला नाही. पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत आपली कामगिरी चोख बजावली. 

सामन्याचा लेखाजोखा 

न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने सलग दुसऱ्या विजायीच नोंद केली. 5 जून रोजी आयर्लंडचा पराभव केला होता. 9 जून रोजी पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरोधात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋषभ पंत याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. विराट, रोहित, सूर्या, हार्दिक, दुबे आणि जाडेजा यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडले. तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.  

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget