एक्स्प्लोर

पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?

india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला.

Babar Azam on india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान खडतर झालेय. त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश जर तर या स्थितीमध्ये पोहचलाय. पाकिस्तानला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, त्याशिवाय अमेरिकाचा दोन्ही सामन्यात पराभव व्हावा लागेल,  तरच पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा आहेत. त्यामुळे भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम याला राग अनावर झाला. सामन्यानंतर बोलताना बाबर आझम यानं पाकिस्तानच्या पराभवाचे कारण सांगितले.  

बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?

पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझम म्हणाला की, 'दहा षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार  गोलंदाजी केली. 120 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकांपर्यंत आम्ही सामन्यात होतो. आमची धावगतीही उत्तम होती. पण लागोपाठ विकेट पडल्याचा आम्हाला फटका बसला. ठरावीक अंतराने विकेट पडल्यामुळे अखेरच्या षटकात जास्त धावा राहिल्या. '

120 धावांचा पाठलाग करताना प्लॅन काय होता? या प्रश्नावर बोलताना बाबर आझम म्हणाला की, आमचा प्लॅन अतिशय सिम्पल होता. स्ट्राईक रोटेट करायचं. प्रत्येक षटकात 5 ते 6 धावा करायच्या. पण आमच्याकडून निर्धाव चेंडू जास्त गेले. त्याचा दबाव वाढत गेला. परिणामी आम्ही तीन विकेट झटपट गमावल्या.

तळाच्या फलंदाजांकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवू शकत नाही. आम्हाला पॉवरप्लेमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. आम्ही 6 षटकात 40-45 धावा करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. पण आम्हाला पॉवरप्लेचा फायदा घेता आला नाही. खेळपट्टी चांगली होती, चेंडू बॅटवर चांगला येत होता. काही वेळा चेंडू उसळी घेत होता. पण  ड्रॉप-इन खेळपट्टीवर असं होऊ शकतं, याचा अंदाज होताच, आम्ही एकेरी दुहेरी धावांवर भर द्यायला हवा होता, असे बाबर आझम म्हणाला.

एकूणच काय तर बाबर आझम यानं पराभवाचं खापर फलंदाजीवर फोडलं. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळेच पाकिस्तानला 120 धावांचा पाठलाग करता आला नाही. पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत आपली कामगिरी चोख बजावली. 

सामन्याचा लेखाजोखा 

न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने सलग दुसऱ्या विजायीच नोंद केली. 5 जून रोजी आयर्लंडचा पराभव केला होता. 9 जून रोजी पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरोधात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋषभ पंत याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. विराट, रोहित, सूर्या, हार्दिक, दुबे आणि जाडेजा यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडले. तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.  

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget