नवी दिल्ली : बीसीसीआयचा कारभार कोणाच्या हाती सोपवला जाणार याचा निर्णय 24 जानेवारीला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर शुक्रावारी झालेल्या सुनावणीत नऊ प्रशासकांचा पर्याय ठेवण्यात आला.


अॅमिकस क्युरी गोपाळ सुब्रमण्यम आणि ज्येष्ठ विधीज्ञ अनिल दिवाण यांनी सीलबंद लिफाफ्यात नऊ नावं सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली आहेत. ही नावं सध्या गुप्त ठेवली जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारीला अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना बीसीसीआयमधील पदांवरून हटवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर बीसीसीआयमध्ये नव्या प्रशासकांची नावं सुचवण्याची जबाबादारी न्यायालयाने सुब्रमण्यम आणि दिवाण यांच्यावर सोपवली होती.

संबंधित बातम्या :


सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य : अनुराग ठाकूर


BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!


क्रिकेटचा विजय झाला, आता अन्य खेळांचाही होऊदे : जस्टिस लोढा


लोढा समितीच्या दहा प्रमुख शिफारशी


शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा


लोढा समितीच्या प्रमुख शिफारशी बीसीसीआयला अजूनही अमान्य


‘बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवा’, लोढा समितीचा सुप्रीम कोर्टाकडे अर्ज