एक्स्प्लोर

Ind Vs SL Asia Cup 2022 : भारत फायनल कशी खेळणार?श्रीलंकेला हरवल्यानंतरही स्थान नाही पक्कं 

Asia Cup Final : आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे.

Asia Cup Final : आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे. अन्यथा भारताला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आज भारताला श्रीलंकेविरोधात विजय मिळवावाच लागणार आहे.  श्रीलंकेविरोधात विजय मिळवल्यानंतरही आशिया चषकाच्या फायनलमधील भारताचे स्थान पक्कं नाही. काय आहेत, समिकरणं पाहूयात..

भारत फायनलमध्ये कसा पोहचणार? 
सुपर-4 स्टेजमध्ये प्रत्येक संघाला तीन-तीन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा सध्या एक सामना झालाय. ज्यामध्ये पाकिस्तानकडून पाच विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. आज भारताचा दुसरा सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडिया आज श्रीलंकाविरोधात दोन हात करणार आहे. 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरोधात सामना होणार आहे. आशिया चषकाच्या गुणतालिकेत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.  भारताला फायनलमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. फक्त विजयच नव्हे तर भारताला चांगल्या नेटरनरेटने सामने जिंकावे लागणार आहे. भारतीय संघाने दोन सामने जिंकल्यास चार गुण होतील. नेटरनरेट चांगला असल्यास कोणत्याही अडचणीशिवाय भारतीय संघ फायनलला पोहचेल. 

फायनलमधून पत्ता कट होणार का?
 
- श्रींलका आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यास भारताचे चार गुण होतील.. अशात फायनलमध्ये पोहचण्याचे चान्सेस वाढतील. 
 
- श्रीलंकेनं जर पाकिस्तानचा पराभव केला तर फायनलसाठी नेटरनरेटचा विचार केला जाईल. 
 
-  श्रीलंकेचा नेट-रनरेट सध्या सर्वात चांगलाय

 - अफगाणिस्तान-श्रीलंका यांचा पराभव करण्यासोबतच  भारताला नेट-रनरेटही वाढवावा लागेल. 

- पाकिस्तान संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरोधात दोन्ही सामने होणार आहेत. जर दोन्ही सामने पाकिस्तान जिंकला तर फायनलमध्ये प्रवेश करेल.  

- आजच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय झाल्यास भारतीय संघाचं फायनलमधील आव्हान संपुष्टात येईल. 

भारत-श्रीलंकेचा अलिकडचा फॉर्म
दोन्ही संघांचा अलीकडचा फॉर्म पाहता भारतीय संघाच पारडं जड दिसतंय. भारतानं यावर्षी 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, 5 सामने गमावले आहेत. एक सामना निर्णित ठरला. दुसरीकडं श्रीलंकेच्या संघानं यावर्षी 14 टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी श्रीलंकेला चार सामने जिंकता आले. तर, 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यातील एक सामना अनिर्णित राहिलाय.

पाकिस्तान, श्रीलंका गुणतालिकेत अव्वल
आशिया चषकाच्या गट सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी आशिया कपच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला. ज्यात श्रीलंका आणि पाकिस्ताननं आपपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर, भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावा लागलं. पाकिस्तान आणि श्रीलंका गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, भारत आणि अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एका संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणं अनिवार्य आहे. 

आशिया चषकात कोणता संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन?

आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतानं सर्वाधिक सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. तर, दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे. जे पाच वेळा चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्ताननं दोन वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. भारत एकमेव संघ आहे, ज्याने आशिया चषकाच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये खिताब जिंकलाय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget