एक्स्प्लोर

झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे योगायोगांची मालिका

पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमवून 333 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने आधी फलंदाजी करुन तंतोतंत तितक्याच, म्हणजे 5 गडी गमवून 333 धावा केल्या.

शारजा :  क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. हातातोंडाशी आलेला अपेक्षित विजय कधी निसटून जातो, तर कधी हातून गेलेली मॅच ऐनवेळी जिंकली जाते. अशाच इंटरेस्टिंग घडमोडींमुळे हा जंटलमन्स गेम लोकप्रिय आहे. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत असाच एक इंटरेस्टिंग योगायोग घडला. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतला पहिला सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या अफगाणिस्तान संघाने जिंकला. 9 फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेवर 154 धावांनी मात केली. झिम्बाब्वेने या पराभवाचा वचपा काढला नसता, तरच नवल. मात्र योगायोगाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानचा पराभव करताना झिम्बाब्वेने एका रनचीही उधारी ठेवलेली नाही. म्हणजेच 11 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर 154 धावांनीच विजय मिळवला. हा योगायोग तर काहीच नाही. खरी मजा तर पुढे आहे... पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमवून 333 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने आधी फलंदाजी करुन तंतोतंत तितक्याच, म्हणजे 5 गडी गमवून 333 धावा केल्या. म्हणजेच दोन्ही वेळा संबंधित संघांसमोर सेम टार्गेट होतं. झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे योगायोगांची मालिका पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या 334 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 179 धावांवर ऑलआऊट झाला, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाव्बेच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघही सर्व गडी गमावून तितक्याच म्हणजे 179 धावांवर माघारी परतला. योगायोगांची मालिका इथेच संपली, असं तुम्हाला वाटत असेल, तर... नाही. दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून एक-एक शतक साजरं करण्यात आलं. पहिल्या सामन्यात अफगाणिस्‍तानसाठी रहमत शाहने 114 धावांची खेळी केली तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने 125 धावा ठोकल्या. दोन्ही सामन्यांमधील स्कोअरबोर्ड सारखंच होतं. पहिला सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर दुसरा झिम्बाब्वेने. क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारचा योगायोग दुर्मिळ मानला जात आहे. त्यामुळे हे सामने क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget