एक्स्प्लोर

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स? ICC नं दिलं स्पष्टीकरण

2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलनं (ICC) शुक्रवारी स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीच्या अॅंटी करप्शन यूनिट (ACU) चे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 2011 वर्ल्ड कप फायनल सामन्यात फिक्सिंग संबंधी असा एकही पुरावा मिळालेला नाही की ज्यामुळं सामन्याची चौकशी केली जावी. अॅलेक्स मार्शल यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला 2011 विश्वचषक फायनल सामन्याबाबत संशय घेण्यासारखं एकही कारण मिळालेलं नाही. या सामन्याबाबत फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर आयसीसी इंटीग्रिटी यूनिटने याबाबत चौकशी केली. मात्र या चौकशीत आमच्यासमोर एकही पुरावा आला नाही, की ज्याच्या आधारावर आम्ही हा सामना फिक्स होण्याच्या आरोपाचं समर्थन केलं जाऊ शकेल.' सामना फिक्स असल्याचा महिंदानंद अलुथगामगेंचा आरोप '2011 चा एकदिवसीय विश्वचषक जो भारताने जिंकला होता, तो फिक्स होता', असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केला होता. मंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी 2011 विश्वचषक फायनल फिक्स होती, असा आरोप केला होता. त्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाने आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीकडे या 'खोट्या' दाव्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. एका स्थानिक टिव्ही चॅनेलला मुलाखत देताना 2011 साली श्रीलंकेचे क्रीडा मंत्री असलेले अलुथगामगे यांनी म्हटलं होतं की, भारत आणि श्रीलंकामधील 2011 विश्वचषक फायनल फिक्स होता. आज मी तुम्हाला सांगतो की, आपण 2011 चा विश्वचषक विकला होता, मी क्रीडामंत्री असतानाही हे बोललो होतो, असा दावा त्यांनी केला होता. '2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स!', श्रीलंकन मंत्र्याचा आरोप, माजी कर्णधाराने केली चौकशीची मागणी यावर अरविंदा डी सिल्वा जे त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं होतं की, आपण लोकांना असत्यापासून प्रत्येकवेळी दूर करु शकत नाही. आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीने याची चौकशी करावी. त्यांनी म्हटलं आहे की, जसं आपण आपल्या विश्वचषक विजयाला साजरं केलं तसंच सचिन तेंडूलकर सारखा खेळाडू आपल्या जीवनातील या सुंदर आठवणींना साजरं करतो. मला वाटतं सचिन आणि भारताच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचं हे कर्तव्य आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. याप्रकारचे गंभीर आरोप अनेक गोष्टींवर परिणाम करतात. अशावेळी निवडकर्ते, खेळाडू, टीम व्यवस्थापन यावर परिणाम होतो. त्यामुळं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, हे खेळासाठी चांगलं राहील, असं अरविंदा डी सिल्वाने म्हटलं होतं. याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा महेला जयवर्धने यांनी देखील अलुथगामगे यांच्या दाव्याचं खंडण केलं होतं. 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शानदार शतकानं 275 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला मिळालं होतं. जे गौतम गंभीर (97) आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (91) जबरदस्त खेळीनं पार केलं होतं. 1983 नंतर दुसऱ्यांना टीम इंडियानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT VS PBKS Live Score IPL 2026 : गुजरात टायटन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पंजाब विरुद्धच्या सामन्यात युवा खेळाडूचे पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11
GT VS PBKS Live Update : गुजरात टायटन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पंजाब विरुद्धच्या सामन्यात युवा खेळाडूचे पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11
SRH vs KKR IPL 2026 : 'किंग खान'चे शिलेदार जिंकले! रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा; हैदराबादचा किल्ला ढासळला, केकेआर अजूनही शर्यतीत
'किंग खान'चे शिलेदार जिंकले! रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा; हैदराबादचा किल्ला ढासळला, केकेआर अजूनही शर्यतीत
SRH VS KKR Score IPL 2026 : हैदराबादच्या 'गडावर' कोलकाताचा झेंडा; SRH ला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का
SRH VS KKR Update : हैदराबादच्या 'गडावर' कोलकाताचा झेंडा; SRH ला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का
Babar Azam World ODI XI : विराट, रोहित OUT; आफ्रिदी, रिझवान IN...; बाबर आझमच्या वर्ल्ड-11मध्ये एकही भारतीय नाही, स्वतःलाही ठरवले 12 वा खेळाडू, सगळेच चक्रावले
विराट, रोहित OUT; आफ्रिदी, रिझवान IN...; बाबर आझमच्या वर्ल्ड-11मध्ये एकही भारतीय नाही, स्वतःलाही ठरवले 12 वा खेळाडू, सगळेच चक्रावले

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget