एक्स्प्लोर

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स? ICC नं दिलं स्पष्टीकरण

2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलनं (ICC) शुक्रवारी स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीच्या अॅंटी करप्शन यूनिट (ACU) चे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 2011 वर्ल्ड कप फायनल सामन्यात फिक्सिंग संबंधी असा एकही पुरावा मिळालेला नाही की ज्यामुळं सामन्याची चौकशी केली जावी. अॅलेक्स मार्शल यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला 2011 विश्वचषक फायनल सामन्याबाबत संशय घेण्यासारखं एकही कारण मिळालेलं नाही. या सामन्याबाबत फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर आयसीसी इंटीग्रिटी यूनिटने याबाबत चौकशी केली. मात्र या चौकशीत आमच्यासमोर एकही पुरावा आला नाही, की ज्याच्या आधारावर आम्ही हा सामना फिक्स होण्याच्या आरोपाचं समर्थन केलं जाऊ शकेल.' सामना फिक्स असल्याचा महिंदानंद अलुथगामगेंचा आरोप '2011 चा एकदिवसीय विश्वचषक जो भारताने जिंकला होता, तो फिक्स होता', असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केला होता. मंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी 2011 विश्वचषक फायनल फिक्स होती, असा आरोप केला होता. त्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाने आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीकडे या 'खोट्या' दाव्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. एका स्थानिक टिव्ही चॅनेलला मुलाखत देताना 2011 साली श्रीलंकेचे क्रीडा मंत्री असलेले अलुथगामगे यांनी म्हटलं होतं की, भारत आणि श्रीलंकामधील 2011 विश्वचषक फायनल फिक्स होता. आज मी तुम्हाला सांगतो की, आपण 2011 चा विश्वचषक विकला होता, मी क्रीडामंत्री असतानाही हे बोललो होतो, असा दावा त्यांनी केला होता. '2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स!', श्रीलंकन मंत्र्याचा आरोप, माजी कर्णधाराने केली चौकशीची मागणी यावर अरविंदा डी सिल्वा जे त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं होतं की, आपण लोकांना असत्यापासून प्रत्येकवेळी दूर करु शकत नाही. आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीने याची चौकशी करावी. त्यांनी म्हटलं आहे की, जसं आपण आपल्या विश्वचषक विजयाला साजरं केलं तसंच सचिन तेंडूलकर सारखा खेळाडू आपल्या जीवनातील या सुंदर आठवणींना साजरं करतो. मला वाटतं सचिन आणि भारताच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचं हे कर्तव्य आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. याप्रकारचे गंभीर आरोप अनेक गोष्टींवर परिणाम करतात. अशावेळी निवडकर्ते, खेळाडू, टीम व्यवस्थापन यावर परिणाम होतो. त्यामुळं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, हे खेळासाठी चांगलं राहील, असं अरविंदा डी सिल्वाने म्हटलं होतं. याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा महेला जयवर्धने यांनी देखील अलुथगामगे यांच्या दाव्याचं खंडण केलं होतं. 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शानदार शतकानं 275 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला मिळालं होतं. जे गौतम गंभीर (97) आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (91) जबरदस्त खेळीनं पार केलं होतं. 1983 नंतर दुसऱ्यांना टीम इंडियानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
MS Dhoni Fined : कॅप्टन कूलची 'ती' चूक महागात पडली; पोलिसांच्या एका कृतीने चाहत्यांचेही धाबे दणाणले, MS धोनीने नेमका किती दंड भरला?
कॅप्टन कूलची 'ती' चूक महागात पडली; पोलिसांच्या एका कृतीने चाहत्यांचेही धाबे दणाणले, MS धोनीने नेमका किती दंड भरला?

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Embed widget