Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Jun 2016 12:40 PM (IST)
1/6
घरात सतत वाद आणि हिंसक प्रकार होत राहिल्यास मुलांमध्ये नकारत्मकतेचं प्रमाण वाढून मुलांमध्ये नैराश्य निर्माण होतं, असं फुलर थॉम्सन यांनी सांगितलं.
2/6
ज्या मुलांनी बालपणात कौटुंबिक वाद पाहिले आहेत, त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 17.3 टक्के आहे. तर घरात शांत वातावरण लाभलेल्या मुलांचं आत्महत्येचं प्रमाण केवळ 2.3 टक्के आहे.
3/6
मुलं लहान असताना घरातील आई-वडिलांचे वाद हे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. यामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो, ज्यामुळे ते आत्महत्याही करतात.
4/6
हे संशोधन ऑनलाईन मासिक चाईल्ड केअर, हेल्थ अँड डेव्हलपमेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
5/6
कॅनडामध्ये 22 हजार 559 कुटुंबांचा अभ्यास करुन हे संशोधन करण्यात आलं आहे.
6/6
घरातील आई-वडिलांचा सततचा हिंसक वादही लहान मुलांच्या आत्महत्येचं कारण ठरु शकतो, असं एका संशोधनात समोर आलं आहे. लेखक फुलर थॉम्सन यांनी हे संशोधन लिहिलं आहे.