Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Aug 2016 08:55 AM (IST)
1/20
आम्ही टाळणं नाही, टक्कर देणं जाणतो. वन रँक वन पेन्शनचं महाकाय काम आम्ही पूर्ण केलं
2/20
दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्व आमचं कुटुंब
3/20
जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न
4/20
बाळाच्या पालनपोषणासाठी प्रसूती रजा 26 आठवड्यांची केली
5/20
आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत
6/20
स्पष्ट धोरण, पारदर्शकतेमुळे आमचं सरकार बेधडक निर्णय घेत आहे
7/20
पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक बनवण्याचा प्रयत्न,पोस्ट ऑफिसला पुनरुज्जीवित करणार
8/20
इको-फ्रेंडली गणेशोत्सव ही देखील समाजसेवाच आहे.
9/20
शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो मातीतून सोनं उगवेल, जलसिंचन योजनेचा आवाका वाढवणार
10/20
प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून विजेची बचत करावी
11/20
कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालयं बनली आहेत
12/20
कायद्याचं जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतंय, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करतोय, कायदे कालसुसंगत बनवतोय
13/20
क आणि ड वर्गातल्या तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केलीय, थेट भरतीमुळे पारदर्शकता
14/20
आधी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारमध्ये दिवसाला १०० किमी रस्ते बनत आहेत
15/20
आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट वितरित केले
16/20
सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची
17/20
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. मोदींच्या भाषणातील मुद्दे -
18/20
देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे
19/20
उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे
20/20
अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय