कोणीही कायदा हातात घेईल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला. मनसे शेतकऱ्यांच्या नावावर उत्तर भारतीयांना मारहाण करणार असेल, तर त्यांनी आधी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. मनसेने शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजार भरवावा, त्याबाबतचा प्रस्ताव घेऊन यावा, मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करेन, असंही शेलार म्हणाले.