एक्स्प्लोर

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : आपली योग्यता काय, संबंध काय, बोलतो काय? आदित्य ठाकरेंच्या राजीनामा मागणीवर श्रीकांत शिंदेंची टीका

ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी गुवाहाटीला जाण्यापासून ते पार बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज (24 फेब्रुवारी) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते पार बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी श्रीकात यांनी अनेक राजकीय टिपण्णी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाण्यामधील चर्चेत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.  

आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. या दौऱ्यामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकताना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर आव्हान दिले होते. याच आव्हानाचा संदर्भ घेत अवधूत गुप्ते यांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा यांकडे कसे बघता असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला. 

आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय?

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.  ते म्हणाले की, आव्हान कोण देतं आणि त्याला प्रतिसाद काय द्यायचा आपण ठरवायला हवं. हत्तीने आपली चाल चालत राहावी, मागे कोण काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय? शिंदे साहेब हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

युवा सेना प्रमुख पद का घेत नाही? असे विचारण्यात आले असता त्यांनी कोणाला असे वाटायला नको की नंबर वन पद ब्लॉक आहे. कोणतेही लाभाचे पद मी घेणार नाही असे आधीच सांगितले होते. आज पुर्वेश कार्याध्यक्ष आहेत, मला ते नको होते असे ते म्हणाले.

ठाणे सोडून जायची वेळ आली आहे का?

ठाणे सोडून जायची वेळ आली आहे का? असं विचारण्यात आला असता श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की 2014 मध्ये जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा मी उमेदवार झालो. शिंदे साहेबांनी रात्रंदिवस काम केले तेव्हा कल्याणमध्ये लोकसभा निवडणूक लढली आणि दीड लाखांच्या फरकाने मी जिंकलो. मी तेव्हा 27 वर्षांचा होतो. पुन्हा त्याच लोकांनी मला साडे तीन लाखांनी जिंकवले. माझ्याकडे चॉईस नव्हती असे ते म्हणाले. 

दरम्यान, त्यांना गुवाहाटीला सर्वजण दिसून आले मात्र तुम्ही दिसला नाही? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, सगळे तिकडे असताना एकटे कोणीतरी पाहिजे ना? मी घरीच ठाण्याला होतो. हे जाणार हेच मला माहीत नव्हते. साहेब 19 तारखेला गेले तेव्हा मला माहित नव्हते. जेव्हा न्यूजमध्ये पहिले तेव्हा कळालं. त्यामुळे काही प्लॅन वगैरे नव्हतं, त्यांना अचानक वाटल्याने ते गेले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे पद रद्द, नेमकं कारण काय?
उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे पद रद्द, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget