एक्स्प्लोर

Solapur News : 'ABP माझा'च्या बातमीने शेतकऱ्यांना दिलासा; उजनी धरणातून आज रात्रीपासून कालव्याद्वारे रब्बीसाठी दुसरे आवर्तन मिळणार

Solapur News : शेतकऱ्यांची पिके जळू नयेत म्हणून रब्बी साथीचे दुसरे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला

यंदा उजनी धरणाची स्थिती चिंताजनक बनली असताना शेतकऱ्यांची पिके जळू नयेत म्हणून रब्बी साथीचे दुसरे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनीतील पाणी पातळी येत्या काही दिवसात वजा पातळीत जाणार असल्याने पुन्हा कालव्यातून पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला  पाणी सोडण्याचे आदेश दिले. आज रात्री नऊ वाजल्यापासून उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब मोरे यांनी सांगितले. हे आवर्तन आज रात्री म्हणजे 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत सोडले जाणार आहे. 'ABP माझा'च्या बातमीनंतर पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरण प्रशासनाला दिले आहेत.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते.

गतवर्षी पाऊस कमी झाला असून उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार  आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

उजनी प्रकल्पात सध्या 5.34 टीएमसी (9.58 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन 2022-23 मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र 2 लाख 54 हजार 253 हेक्टर (84.50 टक्के ) होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

अधीक्षक अभियंता धीरज साळी यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख, कृष्णा खेोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले  हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Car Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Rajan Patil : माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...
माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...
Solapur Anjangaon: अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
Embed widget